मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर ६, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
nilesh chalak beed nilesh chalak beed data-language="en"> बीड जिल्ह्यातील ८९ हजार २८४ कर्जदार शेतक-यांचा सातबारा कोरा बीड : मोठ्या प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील ८९ हजार २८४ कर्जदार शेतक-यांचा सातबारा कोरा झाला असून, ४३० कोटी ५० लाख रुपये मंजूर होऊन बुधवारपासून पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे. ८९ हजार २५३ पैकी ४० हजार १८८ लाभार्थी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे असून उर्वरित लाभार्थी राष्टÑीयकृत बॅँकांचे आहेत. शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर निकष ठरविले होते. त्याची छाननी करण्यात बॅँकांचा वेळ गेला. नंतर आयटी सेंटरकडून मागविली जाणारी माहिती, सॉफ्टवेअरमधील बदलामुळे विलंब होत असल्याने सरकारवर टिकेची झोड उठली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी पात्र ठरले होते. यात २००९ ते २००१६ पर्यंतच्या कर्जदार शेतक-यांचा समावेश आहे. १ डिसेंबर रोजी बीड जिल्हा दौºयावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडवणी येथील कार्यक्रमात जिल्ह्यातील दोन लाख शेतक-यांचे ८०० कोटी रुपये माफ होतील असे संकेत दिले होते. त्
अमरावतीत विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकल्याची आरोपींची कबुली   अमरावती : अमरावतीमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड नाही तर उकळतं तेल फेकल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी सांगितंल आहे. काल (मंगळवार) संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान मालटेकडी भागात हा प्रकार घडला होता. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचही आरोपींनी मान्य केलं आहे.  याप्रकरणी ३ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास दोघांनी तिला गाठून तिच्यावर उकळतं तेलं फेकलं. या हल्ल्यात ती 12 टक्के भाजली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. data-language="en">
data-language="en"> राज्यात सर्व ठिकाणी मराठी अनिवार्य, शासन निर्णय जारी राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. मुंबई :  केंद्र शासनाची कार्यालये, बँका, टपाल, दूरध्वनी कंपन्या, विमा कंपन्या, कर विभाग, रेल्वे, मेट्रो – मोनो, विमानसेवा, गॅस, पेट्रोलियम या ठिकाणी मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार इंग्रजी आणि हिंदीनुसार मराठी भाषेचा सक्षमपणे वापर व्हावा, यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. जनतेशी होणारे सर्व पत्रव्यवहार, संबंधित कार्यालयांच्या सर्व परीक्षा, परिपत्रके, सूचना फलकं मराठीत असणं आता बंधनकारक असेल. केंद्रीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देत नसल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळे सरकारने सुधारित शासन निर्णय जारी केला आहे. विशेष म्हणजे बँकात आणि सर्व आस्थपनांमध्ये मराठी भाषेसाठी मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. दुकानांवरील पाट्या
लॉजवरील छाप्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; तिघांविरोधात गुन्हा निलेश चाळक बीड- अंबाजोगाई  शहरातील प्रशांतनगर भागातील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी   वेश्याव्यवसायाचा  पर्दाफाश केला. अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्ष व अंबाजोगाई शहर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही संयुक्त कारवाई केली. यावेळी दोन महिलांची सुटका करण्यात आली असून तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार,  प्रशांतनगर भागातील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्षाच्या प्रमुख व फौजदार दीपाली गीते यांना मिळाली होती.  त्यांनी पोलिस अधीक्षकांना ही माहिती दिली. जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार अप्पर  अधीक्षक वैभव कलुबर्मे, अंबाजोगाईचे   अधीक्षक अजित बोऱ्हाडे व सहायक   अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गीते, शहर ठाण्याचे फौजदार भारत माने, फौजदार देवकन्या मैंदाड, पो. कॉ. नीलावती खटाणे, सलीम पाशा, विकास नेवडे यांनी मंगळवारी दुपारी जनता लॉजवर छापा टाकला. लॉजमालक इतर महिला व ग्राहकांना बोलावून घेत त्यांच्याकडू
data-language="en"> माजलगावात ऊसाचे ट्रॅक्टर अडविले; शुक्रवारी आमदाराच्या घरावर मोर्चा   निलेश चाळक बीड- ऊसाला २६०० रुपये प्रतिटन भाव द्यावा व उत्पादकांची पिळवणूक थांबवावी या मागणीसाठी येथे शेतकरी संघर्ष समितीने मंगळवारी आक्रमक पवित्रा घेतला. तिन्ही कारखान्यांकडे जाणारे ऊसाचे ट्रॅक्टर अडवून पदाधिकाऱ्यानी रोष व्यक्त केला. शिवाय संघर्ष समितीच्या बैठकीत ऊसदरप्रश्नी शुक्रवारी (दि. ८) आ. आर. टी. देशमुख यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. महिनाभरापासून तालुक्यात ऊसदर व इतर प्रश्नांवर आंदोलन सुरु आहे. शिवसेना, शेकाप व इतर सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन आता शेतकरी संघर्ष समिती गठित केली असून त्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे. मंगळवारी विविध पक्ष- संघटनांचे पदाधिकारी एकवटले. अवघ्या अर्ध्या तासाच्या बैठकीत ऊसदरप्रश्नी करावयाच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. तालुक्यात माजलगाव सहकरी साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखाना व खासगी तत्वावर जयमहेश कारखाना चालविला जातो. या तिन्ही कारखान्यांना ऊसाचे एक टिपरूही न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
data-language="en"> पशुधन घटण्याची समस्या रायगड जिल्ह्य़ातील पशुधनात मोठी घट होत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्य़ात झपाटय़ाने वाढणारे शहरीकरण आणि शेतीक्षेत्रात होणारी घट ही यामागची प्रमुख कारणे ठरली आहेत. शासकीय दुग्धव्यवसायही अडचणीत सापडला आहे. रायगड जिल्हा हा एके काळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. मात्र गेल्या काही वर्षांत हा जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून नावारूपास आला आहे. वाढत्या औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाचे शेतीक्षेत्र आणि त्याला पूरक व्यवसाय अडचणीत येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्य़ातील शेती क्षेत्रात मोठी घट होत असतानाच आता पशुधनातही मोठी घट होण्यास सुरुवात झाल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीमुळे समोर आले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून दर सात वर्षांनी पशुगण ना केली जाते. या पशुगणनेत गेल्या सात वर्षांत १ लाख १९ हजार ६६२ने घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १८व्या पशुगणनेत रायगड जिल्ह्य़ात एकूण ४ लाख १२ हजार २९० एवढे पशुधन होते. यात ३ लाख ३२ हजार २३९ गोवंश जनावरांचा तर ८० हजार ५१ एवढय़ा म्हैसवर्गीय जनावरांचा समावेश होता. १९व्या पशु
data-language="en"> बोंडअळीचे संकट; माजलगावात शेतक-याने १० एकर कापूस उपटला  निलेश चाळक   बीड : माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील  मुंजाबा जाधव या शेतक-याने १० एकरात मोठ्या आशेने लावलेल्या कापसाचे पीक बोंडअळीला वैतागून उपटून टाकायला सुरुवात केली आहे. मंगळवारी पवारवाडी शिवारात हे चिंता जनक दृष्य पहावयास मिळाले.  यावर्षी तालुक्यात खरीप हंगामात ३७ हजार ८७३ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. परंतु; कापसाच्या पहिल्या वेचणीनंतर पिकावर गुलाबी सेंद्रिय बोंडअळीने आक्रमण केले आहे. यामुळे शेतक-याने केलेला खर्चही कापूस उत्पादनातून निघणेही अवघड झाले आहे.  सध्या कापसाला ७० ते ८० बोंडे आहेत. मात्र, कापसावर झालेल्या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे या परिसरातील कापूस उत्पादक  शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. तालुक्यातील पवारवाडी येथील शेतकरी मुंजाबा कडाजीराव जाधव यांनी बोंडअळीच्या प्रादुर्भावाला वैतागून दहा एकर कापूस उपटून टाकला आहे. आधीच बाजारात कापसाला मिळणारा भाव कमी आहे. त्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसानीत भर पडली. कृषी विभागाने तात्काळ पिकांची पाहण