मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट १७, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
शिक्षिकेला भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर पेटवलं! केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. बंगळुरु : भर वर्गात शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोर पेटवल्याची धक्कादायक घटना बंगळुरुतील एका शाळेत घडली आहे. पीडित शिक्षिकेच्या बिझनेस पार्टनरने अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. केजी सुनंदा असं भाजलेल्या शिक्षिकेचं नाव आहे. या घटनेत ती 50 टक्के भाजली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिक्षिका गंभीर भाजली असून तिला देखरेखीखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शिक्षिकेला पेटवून दिल्यानंतर आरोपी रेणुकाराध्या पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. “दुपारी 2 च्या सुमारास एक व्यक्ती वर्गात शिरला आणि शिक्षिकेवर ओरडू लागला. त्यानंतर त्यांच्यात काही क्षण वाद झाला. शिक्षिकेने त्याला वर्गातून बाहेर जाण्यास सांगितलं. मात्र त्याचवेळी त्याने हातातील बाटलीचं झाकण उघडून शिक्षिकेच्य
"गरिबी, स्ट्रगल  व अस्तित्व"                             नुकतंच प्रणयचं काॅलेज चालू झालं. मुंबई मध्ये जाऊन शिक्षण घेणं म्हटलं तर इतकं सोपं नव्हतं. घरच्यांचं विरोध पत्करून प्रणयने मुंबईसारख्या ठिकाणी अॅडमिशन घेतलं होतं. कायदा या क्षेत्रात पदवी मिळविण्याचा मानस होता प्रणयचा. मनाशी एक पक्की खूणगाठ बांधली होती. तसं पण ग्रामीण भागातून शहरी भागात मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षण घेणं खूप कठीण काम असतं. अॅडमिशन तर घेतलं पण रहायचं कुठे हा प्रश्न सतावत होता. रोज  अपडाऊन करणं परवडण्यासारखं नव्हतं. त्यात काॅलेज रात्रपाळीचं होतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सांगितल्या- प्रमाणे "कमवा आणि शिका" याची जाणीव प्रणयला होती. कारण घरची परिस्थिती अगदी हलाखीची होती. मुंबईनगरी मध्ये जाऊन तेथे राहून शिक्षण घेणं शक्य नव्हतं. काय करायचं आता.....? प्रश्न पडला होता. मदतीला कुणीही नव्हतं. कारण मुंबई मध्ये कुणीही कुणाचा नसतो. तेथील लोकांना एकमेकांकडे बघायला सुद्धा वेळ नाही. प्रचंड वेगवान जीवनशैली आहे. दिवसा पार्ट टाईम जाॅब करून रात्री काॅलेज करण्याचा निर्णय प्रणयने  घेतला.     
कोपर्डी बलात्कार: आरोपींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. नवी दिल्ली : राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. बचावपक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका तातडीने फेटाळल्याने, पुन्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी आजच सत्र न्यायालयात पुढील सुनावणी होत आहे. यापूर्वी आरोपीच्या वकिलांनी उज्ज्वल निकम, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साक्ष घेण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका केली होती. मात्र ही याचिका सत्र न्यायालयासह हायकोर्टानेही फेटाळली होती. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने इथेही त्यांची डाळ शिजू दिली नाही. या सर्वप्रकारावरुन आरोपीच्या वकिलांकडून वेळ काढूपणा स
जिल्ह्यात आठ दिवसात सर्वाधिक बारा शेतकर्याच्या आत्महत्या  निलेश चाळक बीड गेल्या पाच ते सहा वर्षापासून बीड जिल्ह्यात सतत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत यावर्षी ही बीड जिल्ह्यात दोन ते तीन महीण्यापासून पावसाने दांडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत त्यामुळे गेल्या आठ दिवसात बीड जिल्ह्यात बारा शेतकर्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयाञा संपवली आहे गेल्या दोन महीण्यापासून तुरळीक पडलेल्या पावसाने पिकांची अवस्था वाईट झाली असून काही ठिकाणी तर शेतकर्यानी उभ्या पिकावर नागंर फिरवला आहे शेतात केलेला खर्च ही शेतातील उत्पन्नातून निघतो का नाही असा प्रश्न शेतकर्याना उपस्थित होत आहे पेरणी साठी घेतलेले कर्ज फिटते का नाही अशी चिंता शेतकर्याना भेडसावत आहे आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर ,कुंटूबाची चिंता अशा अवस्थेत अडकलेल्या शेतकर्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत विभागीय आयुक्त कार्यालय औरगाबाद याच्या कडून मिळालेल्या माहीतीनुसार 6 आँगस्ट ते 13 आँगस्ट च्या काळात बीड जिल्ह्यात सर्वाधिक बारा शेतकर्यान