मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पारनेर बलात्कार आणि हत्या प्रकरण, तीन जण दोषी या तिघांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालय अहमदनगर :  अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी तीन जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालयाने 2014 सालच्या या प्रकरणावर सुनावणी करताना हा निर्णय दिला. या तिघांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. अहमदनगरला पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी संतोष लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्ता शिंदे यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. या तिघांवरही बलात्कार आणि हत्येसह सहा आरोप ठेवण्यात आले होते. काय आहे प्रकरण ? 22 ऑगस्ट 2014 साली लोणी मावळा गावात मुलीवर अत्याचार करुन हत्या करण्यात आली होती. पीडित मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. सायंकाळी पाचच्या सुमारास शाळा सुटल्यावर घरी येताना अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली होती. आरोपींना दोषी ठरवल्यानं...
एफआरपी म्हणजे काय? ऊस दराबाबत सर्रास कानावर पडणारा शब्द म्हणजे एफआरपी. पण एफआरपी म्हणजे काय, त्याचा अर्थ काय? मुंबई:  ऊस दराबाबत सर्रास कानावर पडणारा शब्द म्हणजे एफआरपी. पण एफआरपी म्हणजे काय, त्याचा अर्थ काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर एफीआरपीचं विस्तारित रुप म्हणजे फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस अर्थात रास्त आणि किफायतशीर दर. – सोप्या भाषेत साखर कारखान्यांनी ऊसाला दिलेला प्रतिटन दर – ऊसाचा एकूण उत्पादन खर्च आणि त्यावरील साधारण 15 टक्के नफा गृहित धरुन एफआरपी ठरवला जातो. – 2009 पूर्वी ऊसदर नियंत्रण कायदा, 1966 च्या खंड 3 मधील तरतुदीनुसार, केंद्र सरकार साखरेच्या प्रत्येक हंगामासाठी ऊसाचा वैधानिक किमान भाव म्हणजेच (एसएमपी) निश्चित करत असे. – पण सरकारने 22 ऑक्टोबर 2009 रोजी ऊसदर नियंत्रण कायद्यात दुरुस्ती केली. या कायद्यात ऊस उत्पादकांचा खर्च लक्षात घेऊन माफक नफा मिळण्याची तरतूद केली आहे. – त्यानुसार साखरेच्या हंगामांचा रास्त आणि किफायशीर भाव (एफआरपी) निश्चित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकारचा कृषी आयोग हा दर ठरवतं. – याचाच अर्थ सार...
खेड्यापाड्यातल्या एकेकटीची लढाई...‘एकल महिला आणि पाणीप्रश्न’ या अभ्यासानं समोर आलेलं ग्रामीण भागातील महिलांचं एक वास्तव ग्रामीण भागात एकेकट्या राहणाºया, एकल महिला कशा जगतात? आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या पत्नींसह परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित अशा एकल महिलांच्या जगण्यात दुष्काळानं कोणत्या समस्या निर्माण झाल्या. हिमतीने जगता जगता कुठले नवे प्रश्न त्यांना छळू लागले, हे शोधणारा एक अभ्यास. ऋचिका सुदामे- पालोदकर मराठवाड्याला गेली काही वर्षे दुष्काळानं छळलं. माणसांना जगणं नको केलं, काहींनी स्थलांतर पत्करलं. मोठ्या शहरात लेकराबाळांसह कुटुंब गेली. कुठं कुठं रस्त्यावर आणि वस्त्यांत राहू लागली. जे तेही करू शकले नाही त्यांच्याभोवतीचा दुष्काळ तर जास्तच जीवघेणा. त्यात काही शेतकºयांनी स्वत:ला विषाच्या बाटलीत संपवलं कुठं गळफास लागले. पोरंबाळं पदरात असलेली एकेकटी बाई मागे उरली. तिला तर लेकरांसाठी जगणं भागच होतं. उभं राहणं भाग होतं. तशा अनेकजणींनी संसार सांभाळले, कच्चीबच्ची जगतील म्हणून हिंमत धरली. काहींनी पुन्हा शेती सुरू केली, काहींनी काही उद्योग स्वीकारले. कधी त्यांच्या हिमती...
2018 साली लग्नाचे फारच कमी मुहूर्त, पंचांगकर्त्यांची माहिती चातुर्मास आणि अधिक मासामुळे तब्बल 4 ते 5 महिने लग्नाचे मुहूर्त नाहीत. यंदाच्या तुलनेत पुढच्या वर्षी तब्बल 20 ते 22 मुहूर्त कमी आहेत.           प्रातिनिधिक फोटो मुंबई :  पुढच्या वर्षी ज्यांचा लग्नाचा प्लॅन आहे, त्यांनी एकतर घाई करा किंवा अजून एखादं वर्ष वाट पाहा. कारण चातुर्मास आणि अधिक मासामुळे तब्बल 4 ते 5 महिने लग्नाचे मुहूर्त नाहीत. यंदाच्या तुलनेत पुढच्या वर्षी तब्बल 20 ते 22 मुहूर्त कमी आहेत. पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी ही माहिती दिली आहे. पौष महिन्यात अर्थात नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात एकही मुहूर्त असणार नाही. तर अधिक ज्येष्ठ मास येत असून तो 16 मे ते 13 जून दरम्यान आहे. या कालावधीतही कुठलाही शुभमुहूर्त नसल्याचं सोमण यांनी सांगितलं आहे. मात्र, काही जण आपल्या वेळ आणि सोयीनुसार मुहूर्त काढून शुभकार्य उरकू शकतात. दरम्यान, २०१७ या वर्षातील उर्वरित नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांमध्येही मिळून अद्याप १० विवाह मुहूर्त शिल्लक आहेत. त्यामुळे आता कार्तिकी एकादशीनुसार...
विरारच्या कुटुंबातील सहाजण एकाएकी बेपत्ता, सुनेची तक्रार शर्मा कुटुंबियांची सून संगीता शर्मांनी अमरावतीतून ईमेलद्वारे कुटुंबीय बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.   विरार :  नाशिकाला देवदर्शानासाठी जातो, असं सांगून शर्मा कुटुंबीय गाडीत बसून घरातून बाहेर पडलं, पण परतलंच नाही. विरारच्या ग्लोबल सिटीमधून पहाटे साडेतीन वाजता निघालेले शर्मा कुटुंब सीसीटीव्हीत अखेरचं कैद झालं, पण पुढे त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. शर्मा कुटुंबियांची सून संगीता शर्मांनी अमरावतीतून ईमेलद्वारे कुटुंबीय बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. 15 दिवसांपासून सासरचे सहा जण बेपत्ता असल्याचं त्या सांगतात. विरारच्या ग्लोबल सिटी, एव्हेन्यू जे या सोसायटीमध्ये शर्मा कुटुंबीय राहायचे. सून संगीता शर्मा बाळंतपणासाठी अमरावतीमध्ये होत्या. 15 जूनला त्यांना मुलगी झाली. तर 11 ऑक्टोबरला पती वरुण शर्मा त्यांना भेटायलाही गेले होते. विरार पश्चिमेला वरुण शर्मा, त्यांची पत्नी संगीता शर्मा, दीर अश्विनी शर्मा आणि संगीताची सासू अनिता शर्मा राहतात.  तर विरार पूर्वेला रश्मी गार्डन येथे संगीताच्या पतीचे क...
 शेतमजूर मिळेनात? घाबरु नका, पेरणी ते काढणी सर्व कामं करणारं मशीन! आता शेतकऱ्यांना शेतमजुरावर अवलंबून राहण्याची गरज नाही. कारण पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्व काम करणारं एक मशीन बनवण्यात आलं आहे.   वाशिम:  सुगीच्या दिवसा शेतमजुर मिळणं हे शेतकऱ्यांसमोरचं मोठं आव्हान असतं. एकीकडे पीकं काढण्याची लगबग सुरु असते, त्याचवेळी शेतकऱ्याचं आभाळाकडे लक्ष असतं. कारण हातातोंडाशी आलेलं पीक पावसात अडकू नये म्हणून सुगीत शेतकऱ्यांची गडबड सुरु असते. त्यासाठी जास्तीत जास्त शेतमजुर घेऊन पीक काढण्याचा प्रयत्न असतो. मात्र आता शेतकऱ्यांना शेतमजुरावर अवलंबून राहण्याची गरज नाही. कारण पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्व काम करणारं एक मशीन बनवण्यात आलं आहे. हंगामातील काढणीच्या काळात शेतकऱ्यांना मजुरांच्या तुटवड्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. शेतातील मालाची वेळेत काढणी होणं गरजेचं असतं. मात्र या काढणीसाठी मजुर काही मिळत नाही. वाशिम जिल्ह्यात प्रामुख्यानं सोयाबीनचं पीक घेतलं जातं. सध्या सोयाबीनचं पीक काढणीच्या अवस्थेत आहे. मात्र काढणीला मजुरचं न मिळाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय...
*शेतकऱ्यांनी केव्हां, काय, का लावावे?* दरवर्षी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी व जूनच्या पहिल्या आठवड्यात काकडी लावावी. म्हणजे जुलै, ऑगस्टमध्ये आणि ऐन थंडीत काकडीचे पैसे हमखास होतात. महाशिवरात्रीस कांद्याचे रोप टाकून कांद्याची पात गुढी पाडव्यास लावावी. म्हणजे उन्हाळ्यात व आषाढी एकादशीपर्यंत पातीचे पैसे होतात. १७ मार्च ते १९ मे किंवा हल्लीच्या बदलत्या पावसाच्या हवामानात मृग किंवा आर्द्रा कोरडे जाते, तेव्हा ७ जूनपर्यंत दर आठ दिवसांनी पाण्याची उपलब्धता असेल तर ५ ते १० गुंठ्याचे कोथिंबीरीचे प्लॉट भारतभर करावेत. म्हणजे उन्हाळ्यात कोथिंबीरीचे पैसे होतात. जून-जुलैमध्ये झेंडूचे बी टाकून रोप तयार करावे. म्हणजे हमखास झेंडूचे दसरा-दिवाळीत पैसे होतात. पाऊसमान चांगले असल्यास इंद्रायणी भात करावा. घरी खाण्यासाठी नवीन एच. एम. टी. प्रिमियम वाण करावा. ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्यावर्षी एप्रिल-मे महिन्यात केलेल्या आल्याच्या लागवडीस औषधे व  सेंद्रिय खत वापरून आले ले 'न लागलेले आले' गणपतीपासून काढण्यास सुरुवात करावी, म्हणजे आल्याचे पैसे हमखास होतात. सप्टेंबरमध्ये हस्त बहार धरून लिंबाला ...