मुख्य सामग्रीवर वगळा

खेड्यापाड्यातल्या एकेकटीची लढाई...‘एकल महिला आणि पाणीप्रश्न’ या अभ्यासानं समोर आलेलं ग्रामीण भागातील महिलांचं एक वास्तव

ग्रामीण भागात एकेकट्या राहणाºया, एकल महिला कशा जगतात? आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या पत्नींसह परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित अशा एकल महिलांच्या जगण्यात दुष्काळानं कोणत्या समस्या निर्माण झाल्या. हिमतीने जगता जगता कुठले नवे प्रश्न त्यांना छळू लागले, हे शोधणारा एक अभ्यास.


ऋचिका सुदामे- पालोदकर
मराठवाड्याला गेली काही वर्षे दुष्काळानं छळलं. माणसांना जगणं नको केलं, काहींनी स्थलांतर पत्करलं. मोठ्या शहरात लेकराबाळांसह कुटुंब गेली. कुठं कुठं रस्त्यावर आणि वस्त्यांत राहू लागली. जे तेही करू शकले नाही त्यांच्याभोवतीचा दुष्काळ तर जास्तच जीवघेणा. त्यात काही शेतकºयांनी स्वत:ला विषाच्या बाटलीत संपवलं कुठं गळफास लागले. पोरंबाळं पदरात असलेली एकेकटी बाई मागे उरली. तिला तर लेकरांसाठी जगणं भागच होतं. उभं राहणं भाग होतं. तशा अनेकजणींनी संसार सांभाळले, कच्चीबच्ची जगतील म्हणून हिंमत धरली.
काहींनी पुन्हा शेती सुरू केली, काहींनी काही उद्योग स्वीकारले. कधी त्यांच्या हिमतीच्या बातम्याही झाल्या, कधी मिळालेल्या अगर न मिळालेल्या सरकारी मदतीचा गवगवाही झाला. मात्र पतीपश्चात संसार सावरून धरणाºया एकेकट्या बायकांच्या वाट्याला दुष्काळानं काय आलं. त्यांच्या जगण्याचं नेमकं काय झालं, यासह ग्रामीण भागात एकेकट्या राहणाºया, एकल महिला कशा जगतात, त्यांचे प्रश्न काय याचा एक अभ्यास अलीकडेच करण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या पत्नींसह परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित अशा एकल महिलांच्या जगण्यात दुष्काळानं कोणत्या समस्या निर्माण झाल्या. त्यावर त्यांनी काय तोडगे काढले, जगता जगता नवे प्रश्न कुठले छळू लागले, त्यावर काही उपाय दिसतात का असं शोेधणारा हा अभ्यास.
परिस्थितीने झोडपले आणि निसर्गासह समाजासमोर हतबल असं जगणं वाट्याला आलं तर त्याचं स्वरूप तरी समजून घ्यावं म्हणून हा एक प्रयत्न होता. विकास अध्ययन केंद्राच्या सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड यांनी ‘एकल महिला आणि पाणीप्रश्न’ असा अभ्यास केला आणि त्यातून एक अहवालही मांडला आहे. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमधील ग्रामीण भाग आणि अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील काही गावं येथील महिलांना भेटून हा अभ्यास करण्यात आला.
त्यात त्यांना सर्वसाधारण असं दिसलं की, दुष्काळ तर होताच. त्यात कुटुंबाची फारशी साथ नाही, हाती पैसे नाही. अनेकींकडे तर कसायला शेती नाही, असली तर तिच्यावर अधिकार नाही आणि राहतं घरही अनेकदा स्वत: राहत नाही, तेही सोडावं लागतं. त्यातून पदरी मुलं, त्यामुळे चरितार्थ तर चालवावाच लागतो. आणि तिथंच अनेकींची फरफट सुरू होते. पोट भरायचं साधन शोधणं ते एकटी बाई म्हणून वाईट नजरेने पाहणाºयांपासून स्वत:चं संरक्षण करण्यापर्यंत अनेक गोष्टींना या महिलांना रोजच तोंड द्यावं लागतं. शारीरिक आणि मानसिक आघात सहन करावे लागतात ते वेगळेच.
फक्त दुष्काळ किंवा आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या विधवा नव्हे तर अन्य एकल महिलांचे प्रश्नही गंभीर दिसतात. थोडाफार पैसा हाताशी असल्यामुळे किंवा शिक्षणामुळे शहरी एकल महिलांचे जीवनमान ग्रामीण भागातील महिलांपेक्षा तुलनेने बरे आहे. ग्रामीण भागात अनेकदा एकल महिलेला एकतर एकांगी संघर्ष
करावा लागतो अथवा माहेरी जाऊन आश्रितासारखे, घरगड्यासारखे रहावे लागते. उपासमार, बेरोजगारी, स्थलांतर या समस्या या महिलांना भेडसावतात. त्यात त्यांच्या आरोग्याचेही प्रश्न गंभीर होतात. लहान बालकांना आईचे दूध पुरेसे मिळत नाही, लसीकरण अनियमित होतं. समतोल आहार मिळणं दुरापास्त. त्यामुळे बालकांमध्येही वेगवेगळे आजार तसंच कुपोषण दिसून येते. वयाने मोठ्या असलेल्या मुलांच्या शाळांचा खर्च ही एक समस्या असते. त्यामुळे किमान एक वेळ तरी चूल पेटावी म्हणून ही मुले दप्तर गुंडाळून ठेवतात आणि मजुरीकडे वळतात.
घरातल्या कर्त्या पुरुषाच्या पश्चात एकेकट्या महिलांना काही टारगट पुरुषांचाही त्रास होतो, वयात येणाºया मुलींनाही अनेकांच्या नजरांचा, नको त्या दबावाचाही सामना करावा लागतो. शारीरिक शोषण झाल्याच्या तक्रारीही काहीजणी करतात.
ग्रामीण भागात या एकल महिलांमध्ये रोजंदारीवर काम करणाºया महिलांचं प्रमाण अधिक आहे. पण ते काम मिळणंही सोपं नसतं. एकट्या बाईला कामाची गरज असते, त्यामुळे अनेकदा तिला जास्त राबवून घेतलं जातं. पैसेही पुरेसे मिळतील याची खात्री नाही. बोलायची सोय नसतेच कारण काम गमावण्याची भीती.
असं अनेक प्रश्न या अभ्यासात समोर येतात. काहीजणींच्या कैफियती मन विषण्ण करणाºयाच आहेत.
त्यातलीच एक गीता. (नाव बदललं आहे.) बारावी झाली आणि घरच्यांनी गीताचं लग्न लावून दिलं. वडिलांची आर्थिक परिस्थिती वाईट, हिचं लग्न झालं म्हणजे जबाबदारी उतरली त्यात घरात एक खाणारं तोंड कमी होईल हा त्यांचा हेतू.
लग्नानंतर तिला समजलं की, तिचा नवरा शरीरसुख देऊ शकत नाही. सासरच्या मंडळींना ही गोष्ट माहीत होती. पण तरी त्यांनी हिच्यावरच अंगारेधुपारे सुरू केले. हिने विरोध केल्यावर शारीरिक छळ आणि मारहाण सुरू झाली. शेवटी सासरा म्हणाला, ‘पोरगा असा असला म्हणून काय झाले, मी तर आहे ना..’. जीव मुठीत धरून ती माहेरी पळून आली. आणि आता नवºयानं ‘टाकून दिलेली’ असे लोकांचे टोमणे खात आयुष्य जगते आहे.
अजून एकीची कहाणी अशीच. ती परित्यक्ता. आई विधवा. आईचं वय २३- २४ वर्षेच असेल तेव्हा वडील गेले. हिचं लग्नही जेमतेम पंधराव्याच वर्षी झालं. विसाव्या वर्षापर्यंत पदरात दोन मुली झाल्या. दोन्ही मुलीच झाल्या म्हणून नवºयाने तिला आणि मुलींना कायमचं माहेरी पाठवून दिलं.
आता ती आईसोबत शेतात मजुरी करून स्वत:चं आणि मुलींचं पोट भरते.
अशा किती कहाण्या.
ग्रामीण भागातील एकल महिलांचे प्रश्न सांगणाºया. या प्रश्नांकडे कुणी पहायचं. या बायकांना सन्मानानं जगता यावं, त्यांना रोजगार मिळावा आणि मुलांना शिक्षण मिळावं, आरोग्य सुविधा मिळाव्यात या अपेक्षा काही फार नाहीत.
मात्र आजचं वास्तव असं की, ग्रामीण भागातील एकल महिलांच्या प्रश्नांकडे कुणाचं फारसं लक्ष नाही.
त्यांची उत्तरं तर कितीतरी लांब आहेत..

२००१ आणि २०११ च्या जनगणनेची तुलना केली तर देशात एकल महिलांच्या संख्येत तब्बल ३९ टक्क्यांनी वाढ झालेली दिसते.
२००१ साली एकल महिलांची संख्या ५१.२ दशलक्ष होती. ही संख्या आता ७१. ४ दशलक्ष झाली आहे. यामध्ये परित्यक्ता, घटस्पोटिता, विधवा, अविवाहित अशा सर्वच एकल महिलांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक ६८ टक्के महिला या २५ ते २९ या वयोगटातल्या आहेत.
बायकोला टाकून देणं, सोडून देणं, घटस्फोट आणि आता शेतकºयांनी केलेल्या आत्महत्या ही या मागची कारणं आहेत.
२०११ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २२, ५७, ९७७ एकल महिला आहेत.

एकल महिलांचे प्रमाण मोठं असूनही या महिलांसाठी कोणतंही स्वतंत्र धोरण अस्तित्वात नाही. या महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करून काही गोष्टी या महिलांना मिळाव्यात, असं हा अहवाल सुचवतो आहे.
त्यापैकी काही गोष्टी पुढीलप्रमाणे -
१. अविवाहित, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित एकल महिलांसाठी शासनानं विशेष धोरण आखून त्यांच्या संरक्षणासाठी कायदेशीर तरतूद करावी.
२. घरकुल योजनांना प्राधान्यक्रम द्यावा.
३. जॉब कार्ड नोंदणी आणि मनरेगाचे काम प्राधान्यानं मिळावं.
४. अन्नसुरक्षा योजनेचा लाभ प्राधान्य क्रमानं मिळावा.
५. बीपीएल रेशन कार्ड प्राधान्यक्रमानं मिळावे.
६. आधार कार्ड, मतदान कार्ड नोंदणी, जनधन योजनेचं खातं प्राधान्य क्रमाने उघडले जावे.
७. गावपातळीवर महिलांसाठी सहाय्य कक्ष सुरू करावेत.
८. हुंडा दक्षता समिती सक्षमपणे कार्यान्वित करावी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोपर्डी बलात्कार: आरोपींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. नवी दिल्ली : राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. बचावपक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका तातडीने फेटाळल्याने, पुन्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी आजच सत्र न्यायालयात पुढील सुनावणी होत आहे. यापूर्वी आरोपीच्या वकिलांनी उज्ज्वल निकम, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साक्ष घेण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका केली होती. मात्र ही याचिका सत्र न्यायालयासह हायकोर्टानेही फेटाळली होती. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने इथेही त्यांची डाळ शिजू दिली नाही. या सर्वप्रकारावरुन आरोपीच्या वकिलांकडून वेळ काढूपणा स...
कोपर्डी प्रकरणातील अरोपीवर हल्ला केलेल्या संशयित आरोपींना समाजातील नेते न्याय देतील का - नागेश मिठे.   बीड ( प्रतिनिधी ) अठरा पगड जाती धर्माला सोबती घेऊन चालणाऱ्या नेत्यांना कोपर्डीतील आरोपीवर झालेल्या हल्लीतील संशयित आरोपी गणेश खुणे, अमोल खुणे, बाबु वाळेकर, राजु जराड हे आजही पुणे येथिल येरावडा जेल मध्ये आहेत. यांच्या कडे एकही मराठा समाजाचा नेता लाजिरवाने सुद्धा फिरकला नाही. याचा समाजाने असा अर्थ घ्यायचा कि हे प्रकरण नेत्यांना पेलवत नाही असा अर्थ हळु हळू मराठा समाजात निघत आहे.या सामान्य बांधवांची कुठलीही चुक नसतांनाही कट रचून त्यांच्यावर अठरा सिटे ॲक्ट सारखे गंभीर  स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडे जानिवपुर्वक समाज व समाजातिल ईतर कामात दंड थोपटवणारे नेते दुर्लक्ष करत आहेत. याच गोष्टींचा शासन फायदा ऊठवून शासन त्यांना जामिन सुद्धा देत नाही.न्याय व्यवस्थेची हिच तत्परता कोपर्डीतील अरोपीवर शासन का दाखवत नाही.फास्ट्रोक च्या नावाखाली शासन अरोपीला अभय देत आहे या पैक्षा दुदैव काय आसेल. दि.१एप्रील २०१७ रोजी अहमदनगर  जिल्ह्यातील कोपर्डी येथे चिमुकलीवर झालेला ब...
शेतकर्यांच्या विज प्रश्नांवर छावा क्रांतीवीर सेनेने घातला महावितरणला घेराव.नागेश मिठेपाटिल बीड प्रतिनिधी; आज शेतकरी बोंडआळीने अडचणीत आहे.आणि हे सरकार महावितरणाला शेतकर्याची विज तोडायला सांगत हे सरकार शेतकर्याच्या मुळावर आहे आसे शेतकरी बाधंवा वाटते कुठे या वर्षी पाऊस बरा झाल्यामुळे विहिर बोअरला थोडे पाणी आले आहे.  data-language="en"> मात्र महावितरणच्या आडमुठेपणामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. data-language="en"> पण याची जाण ना सरकारला आहे ना अधिकार्यांना यांना जाब विचारण्यासाठी आज दि. 04 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:00  ते 01:00 वाजेपर्यंत घेरावात घेऊन मा.कार्यकारी अभियंता त्र्यंबके साहेब यांना चर्चा केल्यानंतर छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकारी व शेतकरी बांधवांना सहानुभूतीपूर्वक निवेदन घेऊन कर्मचार्यांना विज जोडणीचे आदेश दिले. यानंतर छावा क्रांतीवीर सेनेने आभारही मानले यावेळी छावा क्रांतीवीर सेना मराठवाडा अध्यक्ष नागेशजी मीठे पाटील, छावा क्रांतीवीर सेना युवक जिल्हा अध्यक्ष अशोक काळकुटे पाटील, शे.का.प.चे नेते भाई दत्ता प्रभाळे, नवनिर्वाचित छा...
शिक्षिकेला भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर पेटवलं! केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. बंगळुरु : भर वर्गात शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोर पेटवल्याची धक्कादायक घटना बंगळुरुतील एका शाळेत घडली आहे. पीडित शिक्षिकेच्या बिझनेस पार्टनरने अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. केजी सुनंदा असं भाजलेल्या शिक्षिकेचं नाव आहे. या घटनेत ती 50 टक्के भाजली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिक्षिका गंभीर भाजली असून तिला देखरेखीखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शिक्षिकेला पेटवून दिल्यानंतर आरोपी रेणुकाराध्या पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. “दुपारी 2 च्या सुमारास एक व्यक्ती वर्गात शिरला आणि शिक्षिकेवर ओरडू लागला. त्यानंतर त्यांच्यात काही क्षण वाद झाला. शिक्षिकेने त्याला वर्गातून बाहेर जाण्यास सांगितलं. मात्र त्याचवेळी त्याने हातातील बाटलीचं झाकण उघडून शिक्षिकेच्य...
दृष्टिकोन : स्वतंत्र मराठवाडा राज्य खरंच शक्य आहे? संजीव उन्हाळे हे यासह सामायिक करा Facebook   हे यासह सामायिक करा Twitter   हे यासह सामायिक करा Messenger   data-language="en"> हे यासह सामायिक करा ईमेल   ख्यातनाम जलतज्ज्ञ आणि स्टॉकहोम पुरस्काराचे मानकरी डॉ. माधवराव चितळे यांनी विकासासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्य होणं आवश्यक आहे, अशी आग्रही मागणी केली. पण, ही मागणी किती व्यवहार्य आहे याचं ज्येष्ठ पत्रकार आणि मराठवाड्याचे अभ्यासक संजीव उन्हाळे यांनी केलेलं विश्लेषण. भाषेचं बंधन पाळून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. पण या एकमेव बंधनावर आधारित संकल्पना फार काळ रुजणार नाही, असं प्रतिपादन डॉ. माधवराव चितळे यांनी गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार घेताना व्यक्त केलं. स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे, ही मागणी या पूर्वीही अधूनमधून करण्यात येत होती. अर्थात, राज्य सरकार मराठवाड्याकडे सापत्नभावानं पाहतं, हे निदर्शनास आणून देण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात ही मागणी केली गेली.  तथापि, या मागणीला मराठवाड्यातून फारसा प्र...
मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?   निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आगोदर मराठा समाजातील शेतकरी आत्महत्या करायचे परंतू आता मात्र यांच मराठा समाजातील शेतकर्याची मुल आणि मुली ही घरच्या हलाखीच्या परिस्थितीला आणि शिक्षण करण्याची ईच्छा असतानाही शिक्षण पुर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागते या नैराशेतून मराठा समाजातील मुल-मुली आत्महत्ये सारखा मार्ग स्वकारत आहेत अशी एक घटना लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली ईथे घडली आहे दोन वर्षापासून  विवाह थाबल्याने आणि हुडां देण्यासाठी डिलांकडे पैैसे नसल्याने मराठा समाजातील शितल वायाळ यांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आहे त्यामुळे मराठा समाजात हुडां घेणे खरच योग्य आाहे का ? असा सवाल ही उपस्थित होत आहे त्यामुळे आज पासून हुंडा बंदीसाठी मराठा समाजातील बाधवांंनी जेवढे जमल तेवढे प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि लातूर येथीील शितल वायाळ ही मुलगी भिसे वाघोली  गावाची आहे आणि ततिने  हुंड्यासाठी आत्महत्या केल्याची दुरदैैवी घटना घडली...
लॉजवरील छाप्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; तिघांविरोधात गुन्हा निलेश चाळक बीड- अंबाजोगाई  शहरातील प्रशांतनगर भागातील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी   वेश्याव्यवसायाचा  पर्दाफाश केला. अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्ष व अंबाजोगाई शहर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही संयुक्त कारवाई केली. यावेळी दोन महिलांची सुटका करण्यात आली असून तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार,  प्रशांतनगर भागातील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्षाच्या प्रमुख व फौजदार दीपाली गीते यांना मिळाली होती.  त्यांनी पोलिस अधीक्षकांना ही माहिती दिली. जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार अप्पर  अधीक्षक वैभव कलुबर्मे, अंबाजोगाईचे   अधीक्षक अजित बोऱ्हाडे व सहायक   अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गीते, शहर ठाण्याचे फौजदार भारत माने, फौजदार देवकन्या मैंदाड, पो. कॉ. नीलावती खटाणे, सलीम पाशा, विकास नेवडे यांनी मंगळवारी दुपारी जनता लॉजवर छापा टाकला. ल...
अकलूजमध्ये 36 महिलांचा गर्भपात करणारं डॉक्टर दाम्पत्य अटकेत अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.   सोलापूर : अकलूज येथील डॉक्टर तेजस आणि प्रिया  गांधी दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर तेजसचे वडिल प्रदीप गांधी यांना काही महिन्यांपूर्वीच गर्भपात केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. वाई येथील एका सीआरपीएफ जवानांच्या पत्नीचे गर्भपात येथे झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या हॉस्पिटलवर छापा टाकला. तपासणी केली असता या दाम्पत्यानं आतापर्यंत 36 गर्भपात केल्याची माहिती उघड झाली. डॉक्टर तेजस गांधी यांचे वडील डॉक्टर प्रदीप गांधी यांनाही गर...
अमरावतीत विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकल्याची आरोपींची कबुली   अमरावती : अमरावतीमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड नाही तर उकळतं तेल फेकल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी सांगितंल आहे. काल (मंगळवार) संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान मालटेकडी भागात हा प्रकार घडला होता. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचही आरोपींनी मान्य केलं आहे.  याप्रकरणी ३ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास दोघांनी तिला गाठून तिच्यावर उकळतं तेलं फेकलं. या हल्ल्यात ती 12 टक्के भाजली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. data-language="en">
शेतकर्याच्या प्रश्नावर छावा क्रांतीवीर सेना उतरणार रस्त्यावर - नागेश मिठेपाटिल बीड (प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यामध्ये पाऊस कमि प्रमाणात होता त्यामुळे मुग. स्वायबिन.तिळ व आदी नगदि पिक वाया गेलेले आहेत त्यामुळे आज शेतकरी हावाल दिल झालेला आहे आणी सरकार कर्ज माफिच्या नाव खाली शेतकर्याला फसवत आहे  सरकारने आत्ता प्रयत्न एक हि योजना शेतकर्याला दिली नाही नुसत्या फसव्या घोषणा सरकार करत आहे लोकांना नगदी दहा हजार रूपये पेरणी साठी देऊ म्हणाले ते पन बॅकं वाल्यानी दिले नाही व वरून मुख्यशाखेला अहवाल पाटवला आमच्या कडे एकही शेतकरी दहा हजार रूपये मागणी करता आला नाही या अशा सरकारच्या व बॅकं आधिकार्याच्या दुटपी धोरणाला शेतकरी वैतागला आहे आज कुठतरी थोडा पाऊस पडला आहे त्यामुळे शेतकरी रब्बीची पेरणी करण्याची तयारी करतोय पन हि भरण घेण्यास पैसा नाही त्यामुळे ज्या शेतकर्याला आत्ता प्रयत्न पिक कर्ज मिळाले नाही आशा शेतकर्याना बॅकेंने तात्काळ पिक कर्ज द्यावे नसता छावा क्रांतीवीर सेना रस्त्यावर उतरेल असा ईशारा मराठवाडा आध्यक्ष नागेश मिठेपाटिल यांनी दिला या वेळी आशोक काळकुटे राहुल हाकाळे गणेश मावसकर  दिपक शिदे...