मराठा समाजाला कुणबी घोषित करा
मराठा समाजाला लोकसंख्येच्या आधारावर OBC प्ररर्वागामध्ये समाविष्ट करावे-
मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीतीची मागणी
बीड-महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी घोषित करून मराठा समाजाला लोकसंख्येच्या आधारावर OBC प्रवागमध्ये समाविष्ट करावेे अशी मागणी पत्राद्वारे महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती आयटी सेलचे बीड जिल्हा प्रमूख निलेश चाळक स्वाभिमानी शेतकरी सघंटनेचे उपजिल्हा प्रमुख निलेश मोहीते,आप्पा शिंदे,आशिश देशमुख, शिवराज कोळसे, रत्नदिप ईगंळे सह आदीनी सरकारकडे केली आहे जिल्हा प्रशासनाला
दिलेल्या पत्र्त्रात त्यानी म्हटले आहे कि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतामध्ये राबनारा हा कुणबी समाज असे म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक हे मूळचे कुणबी आहेत. या कुणबी समाजाचा OBC प्रवागमध्ये समावेश आहे.परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी घोषित करून व महाराष्ट्रातील मराठा समाजाला लोकसंख्येच्या आधारावर OBC प्ररर्वागामध्ये समाविष्ट करावे.व आण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडाळाचि वार्षिक तरतुद दहा हजार कोटी रूपये करावी व सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वतीने सपुर्ण देशाला काळीमा फासणार्या व समानतेच्या घटनेला मारक ठरणार्याया कोपर्डी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी व मराठा समाजातील महीला व मुलीवर होणार्या अन्यायावर कठोर कारवाई करण्यात यावी व अशा घटना भविष्यात घडणार नाहीत यासाठी शासनाने कठोर कायदा करावा व मराठ्यांच्या आई - बहीणीना सरक्षंण देण्यात यावे ,आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे व अनेक चित्रपटातुन मराठ्यांची बदनामी करण्यात आली त्यामुळे भविष्यात अशा चित्रपटावर बंदी आणावी यासह विवीध मागण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मुक मोर्चे काढले आहेत त्यामुळे आपन या सर्व मागण्याची दखल घ्यावी व तसेच महाराष्ट्रातील मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित आहे. मराठा समाज हा आर्थिक,सामाजिक,शैक्षणिकदृष्ट्या दारिद्रमध्ये खितपत पडलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला लोकसंख्याच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी म्हणून घोषित करण्यात यावे .मराठा समाज सध्द्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत अाहे आणि सततच्या दुष्काळी परिस्थिती ,आणि नापीकी यातून अनेक मराठा शेतकरी आत्महत्या करत आहेत,आणि मराठा विद्यार्थ्याकडे शाळा-कोलेजची फिस भरण्यासाठी पैसे नसल्याने व मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे अनेक मराठा विद्यार्थी शिक्षणापासून वचिंत आहेत त्यामुळे सरकारने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे व,शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे अनेक मराठा विदयारथ्याना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते कशामुळे तर फक्त मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुुळे?मराठा समाजाला दिलेले सोळा टक्के आरक्षण रद्द करण्यात आले कारण कि मराठा समाज हा आर्थिक परिस्थितीने विकसनशिल व प्रगत,मागास नसल्याचे कारण पुढे करत मराठा समाजाचे सोळा टक्के आरक्षण रद्द करण्यात आले मला फक्त एवढच आपल्याला सागायच आहे मराठा समाज जर मागास नाही तर ऊसतोंडणी कामगारामध्ये मराठा समाजाचा प्रथम क्रमांक कसा ?मराठा समाज मागास नाहीतर शेतकरी आत्महत्यामध्ये मराठा समाजाचा प्रथम क्रमांक कसा ?मराठा समाज मागास नाहीतर मोल मजूरी करणार्या मध्ये मराठा समाजाचा प्रथम क्रमांक कसा ?मराठा समाज मागास नाहीतर बेरोजगारी मध्ये मराठा समाजाचा प्रथम क्रमांक कसा ?असा सवाल ही मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती आयटी सेलचे बीड जिल्हा प्रमूख निलेश चाळक यानी उपस्थित केला आहे आणि आज जर ग्रामीण भागात आपण जावून पाहीले तर मराठा बाधंवाकडे आपल्या मुलाला शिक्षण देण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे आमची मुले जि.प किवा न.प च्या शाळात शिकतात .व जि.प.न.प शाळेच शिक्षण झाल कि आमच्या मुलांकडे उच्य शिक्षणासाठी पैसे नसतात त्यामुळे आमची मुले शिक्षणापासून वचिंत रहातात व तेथे आमची मुले शिक्षणापासून वचिंत का ?रहातात याचा विचार कधी केला आहे का ? आपण साहेब
व आमच्या काही मराठा बाधंवानी आपल्या मुलांना शिक्षण पुर्ण केल्यानतंर नक्की नोकरी लागेल त्याना माहीती हे की आमची मुले खुप हुशार आहेत पण त्याना हे नव्हत माहीत कि मराठा समाजाला शिक्षणात आरक्षण नाही त्यामुळे कोणत्या सवलती पण नाहीत पण ते तरी काय करणार म्हणुन त्यानी आपल्या मुलांना व्याजाने सावकाराकडूंन. बैकांकडून , पैसे घेवून तर काहीनी घर दार विकून आपल्या मुलांना शिकवले परंतू आज ही त्या मुलाना नोकर्या लागत नसल्याने अनेक मराठा बाधंव आत्महत्या करत आहेत
तर घरची असलेली हलाखीची परिस्थित आणि बेरोजगारीला कटांळून मराठा समाजाची मुल-मुली आत्महत्या करत आहेत या ठिकाणी मला फक्त एकच सागावस वाटत कि आपल्या मुलाने शिक्षण घेवून मोठ्या पदावर जाव ही स्वप्न पहान गुन्हा आहे का ?मग प्रत्यक्षात मग प्रत्यक्षात ते स्वप्न का? खरे होत नाहीत कारण आम्ही गरीब आहोत म्हणून ,आज ग्रामीण भागातील मराठा समाज हा घरकूल व अनेक योजनापासून वचिंत आहे ,व शासनाने जरी एखादी योजना सर्वासाठी आणली तरी ती योजना मराठा समाजापर्यत पोहचत नाही जर पोहचलीच तर तुमचे आधिकारी कमीशन मागतात असा आरोप मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीतीच्यावतीने करण्यात आला आहे या पत्र्त्रावर मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती आयटी सेलचे बीड जिल्हा प्रमूख निलेश चाळक,स्वाभिमानी शेतकरी सघंटनेचे उपजिल्हा प्रमुख निलेश मोहीते,आप्पा शिंदे,आशिश देशमुख, शिवराज कोळसे, रत्नदिप ईगंळे ,सदींप मोरे,आशोक शिदें सह आदीच्या सह्या आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा