मुख्य सामग्रीवर वगळा

दृष्टिकोन : स्वतंत्र मराठवाडा राज्य खरंच शक्य आहे?




 मराठवाडा

ख्यातनाम जलतज्ज्ञ आणि स्टॉकहोम पुरस्काराचे मानकरी डॉ. माधवराव चितळे यांनी विकासासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्य होणं आवश्यक आहे, अशी आग्रही मागणी केली. पण, ही मागणी किती व्यवहार्य आहे याचं ज्येष्ठ पत्रकार आणि मराठवाड्याचे अभ्यासक संजीव उन्हाळे यांनी केलेलं विश्लेषण.
भाषेचं बंधन पाळून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. पण या एकमेव बंधनावर आधारित संकल्पना फार काळ रुजणार नाही, असं प्रतिपादन डॉ. माधवराव चितळे यांनी गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार घेताना व्यक्त केलं.
स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे, ही मागणी या पूर्वीही अधूनमधून करण्यात येत होती. अर्थात, राज्य सरकार मराठवाड्याकडे सापत्नभावानं पाहतं, हे निदर्शनास आणून देण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात ही मागणी केली गेली.
  •  तथापि, या मागणीला मराठवाड्यातून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता डॉ. चितळे यांच्यासारख्या मान्यवरांनी ही मागणी केल्यामुळे त्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठImage copyrightDR. BABASAHEB AMBEDKAR MARATHWADA UNIVERSITY


data-language="en"> अर्थात, चितळे यांनी ही मागणी जलतज्ज्ञ म्हणून केली की संघाच्या भूमिकेला सुसंगत म्हणून? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाची धारणा ही छोट्या राज्यांच्या निर्मितीची आहे.
उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड आणि तेलंगणा या राज्यांची निर्मिती झाली. आता विदर्भ राज्याची पूर्वतयारी करण्याचं काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत.
विदर्भानं स्वतंत्र राज्याची मागणी केली म्हणून मराठवाड्यानं ती करावी, असं नाही. विकास प्रक्रिया गतिमान करण्यासाठी दबाव गटाच्या माध्यमातून ही मागणी केली जाऊ शकते.

कमालीचा मागासलेपणा

मुळात मराठवाडा हा प्रदेश निझामाच्या जोखडाखाली होता आणि 17 सप्टेंबर 1948 ला, म्हणजेच एक वर्ष उशिरानं याला स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळी विनाअट महाराष्ट्रामध्ये सामील होण्याचा निर्णय ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला.
नागपूर विभाग हा 28 सप्टेंबर 1953च्या नागपूर कराराप्रमाणे महाराष्ट्रात सामील झाला. नागपूर करारामध्ये प्रादेशिक लोकसंख्येनुसार निधीचं वाटप, त्याचप्रमाणे सरकारी सेवा, शिक्षण यांमध्ये नागरिकांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळावं, अशा दोन प्रमुख अटी होत्या.
मराठवाड्यानं तशा अटीतटी घातल्या नाहीत.
तथापि, 1956 मध्ये देशाच्या घटनेमध्ये सातवी घटनात्मक दुरुस्ती करून 371(1) आणि 371(2) कलमांन्वये नमूद करण्यात आलं होतं की, मागासलेल्या प्रदेशांना न्याय मिळावा, यासाठी वैधानिक विकास मंडळांची स्थापना करावी.
महत्त्वाची बाब म्हणजे मराठवाडा विभागावर कधीही ब्रिटिशांचं साम्राज्य नव्हतं. निझामासाठी मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकाचा सवता सुभा ब्रिटिशांनी काढून दिला होता.
ब्रिटिशांचं राज्य नसल्यामुळे या भागात रेल्वे, रस्ते, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधा कधी करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे कमालीचा मागासलेपणा या भागात दिसून येत होता.


दुष्काळग्रस्तImage copyrightGETTY IMAGES
प्रतिमा मथळा2012 ते 2015 दरम्यान मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती होती.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांनी अखेरच्या क्षणापर्यंत मराठवाड्याची अस्मिता जोपासली. पण त्यांनी कधीही मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावं, अशी मागणी केली नाही.
मात्र घटनेप्रमाणे वैधानिक विकास मंडळं स्थापन करण्याचा सातत्यानं आग्रह धरला.
  •  तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांना ही कल्पना फारशी पटलेली नसतानाही आपल्या मित्राच्या, म्हणजेच गोविंदभार्इंच्या आग्रहाखातर त्यांनी वैधानिक विकास मंडळांची स्थापना केली. दांडेकर समितीच्या अहवालाप्रमाणे विकासाचा असमतोल दूर करावा, असं ठरलं.
असमतोल असा की, मराठवाड्याचा मानव विकास निर्देशांक हा राज्याच्या सरासरी निर्देशांकापेक्षा ०.५८ टक्क्यांनी कमी आहे.
त्यावेळी तत्कालीन केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांनी या मागणीला विरोध केला होता. लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांच्या अधिकाराचा संकोच होतो आणि राज्यपालाचे अधिकार या मंडळामुळे वरचढ ठरतात, असं त्यांचं म्हणणं होतं.
1996 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल असताना पी. सी. अलेक्झांडर यांनी या वैधानिक मंडळांकडे विशेष लक्ष पुरविलं. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला कामासाठी निधी कमी पडला तेव्हा संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून वैधानिक विकास मंडळाचा निधी सर्रास वापरला गेला.

नव्या पिढीला अस्मितेचा गंध नाही

आता तर या मंडळाच्या कार्यालयाला ओकेबोके स्वरूप आले असून भाजप सरकारनं या मंडळावर साधा अध्यक्षही नेमला नाही आहे.
म्हणजे मराठवाड्याचा विकास हा राज्य घटनेच्या तरतुदीप्रमाणे आणि दांडेकर तसंच केळकर समितींच्या निकषांवर व्हावा, असा जो प्रयत्न करण्यात आला, तो आता सर्वस्वी थांबला आहे.
लक्षणीय गोष्ट म्हणजे सत्तरच्या दशकात मराठवाड्याची अस्मिता ही अत्यंत तीव्र होती. आपल्या विभागाबद्दल लोक जागरूक होते.


मराठवाड्यातले शेतकरीImage copyright मराठवाड्यात ब्रिटिशांचे राज्य नव्हतं त्यामुळे या भागात मागासलेपणा दिसून येतो.

त्यामुळेच 1974 ला या विभागात मोठं विकास आंदोलन झालं. दोन जणांचा बळी गेला, जाळपोळ, लाठीमार झाला, पण हे आंदोलन थांबत नाही, असं दिसताच सरकारला नमतं घ्यावं लागलं.
विकास आंदोलनामुळेच परभणीला कृषी विद्यापीठ आणि अंबेजोगाईला वैद्यकीय महाविद्यालयाला शासनानं हिरवा कंदील दाखवला.
1991च्या जागतिकीकरणानंतर सारंच चित्र बदलत गेलं. आपण ज्याला मराठवाड्याची अस्मिता म्हणतो, ती तेवत ठेवण्याचा प्रयत्न कोणत्याही नेत्यानं केला नाही.
नवीन पिढीला तर मराठवाड्याची अस्मिता म्हणजे काय, याची गंधवार्ता नाही. त्यामुळेच डॉ. चितळे यांनी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केली तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
विदर्भामध्ये संघाचे एकनिष्ठ कार्यकर्ते श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी मानसिकता तयार करण्यासाठी सहेतुक प्रयत्न केले. त्यांच्या स्वतंत्र विदर्भाच्या मागणीच्या प्रयत्नांना विदर्भातून प्रतिसादही मिळत आहे.

data-language="en"> या उलट मराठवाड्यात मात्र खुद्द श्रीहरी अणे यांनाच स्वतंत्र मराठवाड्याच्या मुद्यावरून प्रक्षोभाला सामोरं जावं लागलं. शिवसेनेने अखंड महाराष्ट्राची भूमिका लावून धरल्यानं श्रीहरी अणे यांचं महाभियोक्ता पदही गेलं.
  •    आता बऱ्याच उशिरानं डॉ.चितळे यांच्या आडून संघानं स्वतंत्र मराठवाड्याची मागणी लावून धरली आहे. पण नवीन पिढीला मराठवाड्याच्या अस्मितेशी काही देणंघेणं नाही. साधं विभागीय आयुक्तालय लातूरला व्हावं की नांदेडला, यावरून अखंड वाद सुरू आहे.
भाजपचं सरकार आल्यापासून मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या IIM, IIT, AIIMS, राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण, नॅशनल लॉ स्कूल; एवढंच नव्हे तर चक्क विजेचं अनुदानही विदर्भाकडेच वळवलं.
एवढेच कशाला, नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागासाठी 107 प्रकल्पांना केंद्राकडून निधी आणि मान्यता मिळवून आणली. यामध्ये बारकाईनं बघितलं तर बहुतांशी प्रकल्प हे विदर्भालाच दिले गेले आहेत.
वानगीदाखल सांगायचं म्हणजे, सर्वाधिक आत्महत्या असलेल्या बीड जिल्ह्याला यातून केवळ एकच प्रकल्प कसाबसा मिळाला. पण म्हणून मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावं, असं मात्र सर्वसामान्य तरुणांना वाटत नाही.

राजकीयदृष्ट्या शिवसेना सरस

राजकीयदृष्ट्या मराठवाड्यावर शिवसेनेचा मोठा पगडा आहे. खेड्यापाड्यात शिवसेनेच्या शाखा अजूनही कार्यरत आहेत. संयुक्त महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाहीत, ही शिवसेनेची ठाम भूमिका असल्यामुळे त्यांचा या मागणीला राजकीय पाठिंबा मिळणं दुरापास्त आहे.


बीबी-का-मकबराImage copyrightGETTY IMAGES
प्रतिमा मथळाऔरंगाबाद येथील प्रसिद्ध बीबी-का-मकबरा.

मराठवाडा हा पारंपरिकदृष्ट्या विद्यापीठाच्या नामांतरापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. आजही या दोन पक्षांचं प्राबल्य नाकारता येत नाही.

data-language="en">
India Jobs
काँग्रेस पक्षाची भूमिका ही स्वतंत्र मराठवाड्याची मुळीच नाही, असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं आहे. अशा स्थितीत राजकीयदृष्ट्या या मागणीला फारसा पाठिंबा मिळेल, असे चित्र नाही.
स्वतंत्र राज्य व्हावं, यासाठी विदर्भाकडे पुरेशी संसाधनं आहेत. प्रवाही नद्या, खनिजं, जंगल, वीज असं मूलभूत महसुली भांडवल उपलब्ध आहे.
मराठवाड्यात 13 टक्क्यांपेक्षाही कमी सिंचन, तीन टक्क्यांपेक्षाही कमी वनक्षेत्र, 80 टक्के जमिनीचं सेंद्रीय कर्ब कमी झालेलं असल्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीत दारिद्र्य झाकता येण्यासारखं नाही.
साधं जायकवाडी धरणाचं पाणी मिळवायचं असेल तर नगर, नाशिकच्या पुढाऱ्यांची मनधरणी करावी लागते.
अर्थात, मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी एक दबावतंत्र म्हणून मराठवाडा राज्याची मागणी करण्यामध्ये अनुचित काहीही नाही. विकासाची कामं या विभागात होण्यासाठी सातत्यानं दबाव वाढविणं गरजेचंच आहे.
आजपर्यंत मराठवाड्याच्या शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यांसारख्या नेत्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषविलं. काही प्रमाणात विकास झालाही, पण राज्याचा कारभार पाहताना आपल्याच ताटात सगळं ओढून घेण्याचा प्रयत्न त्यांनी कधी, केला नाही.

data-language="en"> विलासराव आणि अशोक चव्हाण यांची बरीचशी शक्ती राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत बांधून ठेवण्यामध्येच गेली. 
डॉ. माधवराव चितळे यांच्या आडून संघपरिवारानं स्वतंत्र मराठवाड्याची मागणी लावून धरली आहे. सध्या भाजप सर्वसत्ताक असल्यामुळे या मागणीला प्रसिद्धीपुरतं बळ मिळेल. पण सध्या तरी तरुणवर्ग तसंच इतर जनसमुदायांचा मराठवाडा राज्य निर्मितीबाबत प्रतिसाद नगण्यच म्हणावा लागेल.
(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचा मराठवाड्यातल्या विविध विषयांचा अभ्यास आहे.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोपर्डी बलात्कार: आरोपींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. नवी दिल्ली : राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. बचावपक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका तातडीने फेटाळल्याने, पुन्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी आजच सत्र न्यायालयात पुढील सुनावणी होत आहे. यापूर्वी आरोपीच्या वकिलांनी उज्ज्वल निकम, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साक्ष घेण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका केली होती. मात्र ही याचिका सत्र न्यायालयासह हायकोर्टानेही फेटाळली होती. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने इथेही त्यांची डाळ शिजू दिली नाही. या सर्वप्रकारावरुन आरोपीच्या वकिलांकडून वेळ काढूपणा स
कोपर्डी प्रकरणातील अरोपीवर हल्ला केलेल्या संशयित आरोपींना समाजातील नेते न्याय देतील का - नागेश मिठे.   बीड ( प्रतिनिधी ) अठरा पगड जाती धर्माला सोबती घेऊन चालणाऱ्या नेत्यांना कोपर्डीतील आरोपीवर झालेल्या हल्लीतील संशयित आरोपी गणेश खुणे, अमोल खुणे, बाबु वाळेकर, राजु जराड हे आजही पुणे येथिल येरावडा जेल मध्ये आहेत. यांच्या कडे एकही मराठा समाजाचा नेता लाजिरवाने सुद्धा फिरकला नाही. याचा समाजाने असा अर्थ घ्यायचा कि हे प्रकरण नेत्यांना पेलवत नाही असा अर्थ हळु हळू मराठा समाजात निघत आहे.या सामान्य बांधवांची कुठलीही चुक नसतांनाही कट रचून त्यांच्यावर अठरा सिटे ॲक्ट सारखे गंभीर  स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडे जानिवपुर्वक समाज व समाजातिल ईतर कामात दंड थोपटवणारे नेते दुर्लक्ष करत आहेत. याच गोष्टींचा शासन फायदा ऊठवून शासन त्यांना जामिन सुद्धा देत नाही.न्याय व्यवस्थेची हिच तत्परता कोपर्डीतील अरोपीवर शासन का दाखवत नाही.फास्ट्रोक च्या नावाखाली शासन अरोपीला अभय देत आहे या पैक्षा दुदैव काय आसेल. दि.१एप्रील २०१७ रोजी अहमदनगर  जिल्ह्यातील कोपर्डी येथे चिमुकलीवर झालेला बलात्कार हा अंगावर श
शेतकर्यांच्या विज प्रश्नांवर छावा क्रांतीवीर सेनेने घातला महावितरणला घेराव.नागेश मिठेपाटिल बीड प्रतिनिधी; आज शेतकरी बोंडआळीने अडचणीत आहे.आणि हे सरकार महावितरणाला शेतकर्याची विज तोडायला सांगत हे सरकार शेतकर्याच्या मुळावर आहे आसे शेतकरी बाधंवा वाटते कुठे या वर्षी पाऊस बरा झाल्यामुळे विहिर बोअरला थोडे पाणी आले आहे.  data-language="en"> मात्र महावितरणच्या आडमुठेपणामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. data-language="en"> पण याची जाण ना सरकारला आहे ना अधिकार्यांना यांना जाब विचारण्यासाठी आज दि. 04 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:00  ते 01:00 वाजेपर्यंत घेरावात घेऊन मा.कार्यकारी अभियंता त्र्यंबके साहेब यांना चर्चा केल्यानंतर छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकारी व शेतकरी बांधवांना सहानुभूतीपूर्वक निवेदन घेऊन कर्मचार्यांना विज जोडणीचे आदेश दिले. यानंतर छावा क्रांतीवीर सेनेने आभारही मानले यावेळी छावा क्रांतीवीर सेना मराठवाडा अध्यक्ष नागेशजी मीठे पाटील, छावा क्रांतीवीर सेना युवक जिल्हा अध्यक्ष अशोक काळकुटे पाटील, शे.का.प.चे नेते भाई दत्ता प्रभाळे, नवनिर्वाचित छा
शिक्षिकेला भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर पेटवलं! केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. बंगळुरु : भर वर्गात शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोर पेटवल्याची धक्कादायक घटना बंगळुरुतील एका शाळेत घडली आहे. पीडित शिक्षिकेच्या बिझनेस पार्टनरने अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. केजी सुनंदा असं भाजलेल्या शिक्षिकेचं नाव आहे. या घटनेत ती 50 टक्के भाजली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिक्षिका गंभीर भाजली असून तिला देखरेखीखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शिक्षिकेला पेटवून दिल्यानंतर आरोपी रेणुकाराध्या पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. “दुपारी 2 च्या सुमारास एक व्यक्ती वर्गात शिरला आणि शिक्षिकेवर ओरडू लागला. त्यानंतर त्यांच्यात काही क्षण वाद झाला. शिक्षिकेने त्याला वर्गातून बाहेर जाण्यास सांगितलं. मात्र त्याचवेळी त्याने हातातील बाटलीचं झाकण उघडून शिक्षिकेच्य
मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?   निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आगोदर मराठा समाजातील शेतकरी आत्महत्या करायचे परंतू आता मात्र यांच मराठा समाजातील शेतकर्याची मुल आणि मुली ही घरच्या हलाखीच्या परिस्थितीला आणि शिक्षण करण्याची ईच्छा असतानाही शिक्षण पुर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागते या नैराशेतून मराठा समाजातील मुल-मुली आत्महत्ये सारखा मार्ग स्वकारत आहेत अशी एक घटना लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली ईथे घडली आहे दोन वर्षापासून  विवाह थाबल्याने आणि हुडां देण्यासाठी डिलांकडे पैैसे नसल्याने मराठा समाजातील शितल वायाळ यांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आहे त्यामुळे मराठा समाजात हुडां घेणे खरच योग्य आाहे का ? असा सवाल ही उपस्थित होत आहे त्यामुळे आज पासून हुंडा बंदीसाठी मराठा समाजातील बाधवांंनी जेवढे जमल तेवढे प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि लातूर येथीील शितल वायाळ ही मुलगी भिसे वाघोली  गावाची आहे आणि ततिने  हुंड्यासाठी आत्महत्या केल्याची दुरदैैवी घटना घडली आहे  आणि ततसेच लातूर
लॉजवरील छाप्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; तिघांविरोधात गुन्हा निलेश चाळक बीड- अंबाजोगाई  शहरातील प्रशांतनगर भागातील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी   वेश्याव्यवसायाचा  पर्दाफाश केला. अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्ष व अंबाजोगाई शहर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही संयुक्त कारवाई केली. यावेळी दोन महिलांची सुटका करण्यात आली असून तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार,  प्रशांतनगर भागातील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्षाच्या प्रमुख व फौजदार दीपाली गीते यांना मिळाली होती.  त्यांनी पोलिस अधीक्षकांना ही माहिती दिली. जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार अप्पर  अधीक्षक वैभव कलुबर्मे, अंबाजोगाईचे   अधीक्षक अजित बोऱ्हाडे व सहायक   अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गीते, शहर ठाण्याचे फौजदार भारत माने, फौजदार देवकन्या मैंदाड, पो. कॉ. नीलावती खटाणे, सलीम पाशा, विकास नेवडे यांनी मंगळवारी दुपारी जनता लॉजवर छापा टाकला. लॉजमालक इतर महिला व ग्राहकांना बोलावून घेत त्यांच्याकडू
अकलूजमध्ये 36 महिलांचा गर्भपात करणारं डॉक्टर दाम्पत्य अटकेत अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.   सोलापूर : अकलूज येथील डॉक्टर तेजस आणि प्रिया  गांधी दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर तेजसचे वडिल प्रदीप गांधी यांना काही महिन्यांपूर्वीच गर्भपात केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. वाई येथील एका सीआरपीएफ जवानांच्या पत्नीचे गर्भपात येथे झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या हॉस्पिटलवर छापा टाकला. तपासणी केली असता या दाम्पत्यानं आतापर्यंत 36 गर्भपात केल्याची माहिती उघड झाली. डॉक्टर तेजस गांधी यांचे वडील डॉक्टर प्रदीप गांधी यांनाही गर्भपात आणि सोनो
अमरावतीत विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकल्याची आरोपींची कबुली   अमरावती : अमरावतीमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड नाही तर उकळतं तेल फेकल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी सांगितंल आहे. काल (मंगळवार) संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान मालटेकडी भागात हा प्रकार घडला होता. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचही आरोपींनी मान्य केलं आहे.  याप्रकरणी ३ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास दोघांनी तिला गाठून तिच्यावर उकळतं तेलं फेकलं. या हल्ल्यात ती 12 टक्के भाजली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. data-language="en">
शेतकर्याच्या प्रश्नावर छावा क्रांतीवीर सेना उतरणार रस्त्यावर - नागेश मिठेपाटिल बीड (प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यामध्ये पाऊस कमि प्रमाणात होता त्यामुळे मुग. स्वायबिन.तिळ व आदी नगदि पिक वाया गेलेले आहेत त्यामुळे आज शेतकरी हावाल दिल झालेला आहे आणी सरकार कर्ज माफिच्या नाव खाली शेतकर्याला फसवत आहे  सरकारने आत्ता प्रयत्न एक हि योजना शेतकर्याला दिली नाही नुसत्या फसव्या घोषणा सरकार करत आहे लोकांना नगदी दहा हजार रूपये पेरणी साठी देऊ म्हणाले ते पन बॅकं वाल्यानी दिले नाही व वरून मुख्यशाखेला अहवाल पाटवला आमच्या कडे एकही शेतकरी दहा हजार रूपये मागणी करता आला नाही या अशा सरकारच्या व बॅकं आधिकार्याच्या दुटपी धोरणाला शेतकरी वैतागला आहे आज कुठतरी थोडा पाऊस पडला आहे त्यामुळे शेतकरी रब्बीची पेरणी करण्याची तयारी करतोय पन हि भरण घेण्यास पैसा नाही त्यामुळे ज्या शेतकर्याला आत्ता प्रयत्न पिक कर्ज मिळाले नाही आशा शेतकर्याना बॅकेंने तात्काळ पिक कर्ज द्यावे नसता छावा क्रांतीवीर सेना रस्त्यावर उतरेल असा ईशारा मराठवाडा आध्यक्ष नागेश मिठेपाटिल यांनी दिला या वेळी आशोक काळकुटे राहुल हाकाळे गणेश मावसकर  दिपक शिदे आविनाश त