मुख्य सामग्रीवर वगळा
माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी
निलेश चाळक जिरेवाडी मो, 9767894619 
 (लेखक हे हुंडा निर्बंध समितीचे सदस्य आहेत)

महाराष्ट्रात आणि विशेषता मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रशन ऐरणीवर आला होता परंतू आत्ता याच मराठवाड्यात हुंडा देण्यासाठी शेतकरी बापाकडे पैसे नसल्याने मुलीही आत्महत्या करत आहेत मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकरी बापाकडे हुंडा देण्यासाठी पैसे नसल्याने एका वर्षात दोन मुलीनी आत्महत्या केल्या होत्या, या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती,आपण म्हणतो हुंडा घेवू नका आणि हुंडा देवू नका परंतू हुंडा देऊ नका म्हणनारेच लोक हुंडा देतात अन् मोठ्या तोर्यात सागतात आम्ही वढा हुंडा घेतला तुम्ही किती घेतला अंस म्हणून प्रत्येक जण हुडा घेतो आणि देतो त्यामुळे या हुंड्याला माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी घालत असल्याचे दिसून येत आहे,••हुंडा पद्धतीच्या बाबतीत आज समाजातील प्रत्येकच माणूस जवळजवळ डुप्लिकेटच आहे. वधू पक्ष असेल तर हुंडापद्धतीला शिव्याव्याप दिेले जातात. वर पक्ष असेल तर हुंड्याचे समर्थन केले जाते. याला कारण, हुंड्यासाठी जेवढा वर पक्ष जबाबदार आहे, तेवढाच वधू पक्षही जबाबदार आहे. या पद्धतीला दोन्ही पक्षांकडून आजपर्यंत मिळत आलेल्या प्रतिसादामुळेच अनेक मुलींना आत्महत्या करण्याचा मार्ग स्विकारावा लागला आहे.
आणि या हुंडा देण्या आणि घेण्याला वर आणि वधू कडील दोन्ही पक्ष तेवढेच जबाबदार आहेत व हुंडा हे एकप्रकारचे  प्रलोभन आहे आणि हे जर मिळत असेल  तर आणि हमखास हुंडा  मिळतोच म्हणून केवळ अपवादात्मक अपवाद वगळता, लाखात एखादा वर पक्ष हुडाा घेण्यास नकार देतो व शिवाय हुंडा घेणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षणही  मानले जाते आणि यामध्ये जितकी हुंडा रक्कम मोठी तितका अधिकचा मोठेपणा, बडेजाव मिरविण्याची संधी अधिक महत्त्वाची मानली जाते. महत्त्वाचे म्हणजे याच वर पक्षाने प्रत्येक मुलीच्या लग्नाच्या वेळी वर पक्षाच्या अपेक्षेइतका हुंडा मोजलेला असतो. मुलीच्या लग्नाच्या वेळी वधू पक्षाला हुंडा मोजावाच लागतो. त्याशिवाय मुलींची लग्न होत नाहीत, अशी प्रत्येक वधू पित्याची हुंडा ही अगतिकता, अपरिहार्यता, मजबुरी असेल तर मुलाच्या लग्नाच्या वेळी हुंडा स्वीकारण्यात किंबहुना मागणी करण्यात, त्यासाठी अडून बसण्यातही काही गैर नाही, असा सर्वांचा समज आहे. हुंड्याच्या बाबतीत एक विचित्र मानसिकता समाजात आहे. कुठल्याही प्रकारे ही समस्या हाती लागण्यासारखी नाही.  
एकीकडे मुलीच्या लग्नामध्ये हुंडा द्यायला पैसे नाहीत, म्हणून गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. एवढेच नव्हे तर वडिलांच्या डोक्यावरचे ओझे कमी व्हावे, म्हणून लातूरच्या शितल वायाळ या तरुणीने आत्महत्या केल्याची घटनाही हल्लीच घडली. आजच्या काळामध्येदेखील या घटना कानावर पडल्या की मन सुन्न होते. दुसरीकडे लग्नातील वायफळ खर्चाला कात्री लावत काही तरुण जोडपी सामाजिक कार्यासाठी स्वेच्छेने आर्थिक साहय्य करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. आता या दोन घटनांमधून कोणती घटना समाजासाठी हितकारक आणि कोणती घातक आहे, याचा जरा गांभीर्याने विचार करायला हवा.
आज घराघरात हुंड्याचे समर्थक असल्यामुळे सर्व आया-बहिणी सासर आणि माहेरच्या तावडीत सापडून हतबल झाल्या आहेत. हा सर्व प्रकार फक्त आर्थिकदृष्ट्या कमकुवत, कर्जाला बळी पडणार्‍यांना सहन करावा लागतो असा समज असेल, तर तोही चुकीचा आहे. उच्चशिक्षित आणि श्रीमंतांच्या घरांमध्येदेखील हे प्रकार सर्रास घडतात. आपल्याकडे लग्न ठरविताना मानपान, दागिने, बस्ता तसेच इतर अनेक गोष्टींसाठी पाण्यासारखा पैसा मोजला जातो. आजही काही ठिकाणी लग्नाचा सर्व खर्च मुलीच्या कुटुंबीयांना करावा लागतो. त्यामध्ये मानपान ही एक महाभयंकर पद्धत असते. यामध्ये काही राहून गेेले तर मुलाकडच्या मंडळींचे टोमणे ऐकावे लागतात. मग अशा वेळेस पैशाचे कशाही प्रकारे नियोजन करून मुलाकडच्या मंडळींना खुश करण्याची कसरत करावी लागते. या मानपानाच्या कारणास्तव भरमंडपामध्ये लग्न मोडल्याचे प्रकारदेखील घडतात. ताजे उदहारण द्यायचे झाले तर अलीकडेच लग्नाच्या जेवणामध्ये किती रसगुल्ले द्यायचे यावरून मुलगा आणि मुलींकडच्या मंडळींमध्ये वाद झाला. यामध्ये मुलीच्या वडिलांचा अपमान झाल्याने मुलीने लग्न मोडले. लग्नासारखे पवित्र बंधन या अशा कारणांमुळे तुटते ही बाब खरंच गंभीर आहे. पूर्वी शिक्षणाअभावी तसेच समाजाच्या दबावामुळे परंपरा जोपासण्याचा प्रकार सुरू होता. मात्र, काही ठिकाणी मार्ग चुकीचा असल्याचे माहिती असूनदेखील त्याच मार्गाने जाण्याचा वेडेपणा केला जात आहे. आजही काही सुशिक्षित मुलगे हुंड्याला समर्थन देत असतात. केवळ आईवडिलांची मर्जी सांभाळण्यासाठी काही मुले हुंड्याची अपेक्षा करतात. हुंड्याची अत्यंत वाईट रूढी भारतीय समाजात खोलवर रुजली आहे. हुंड्याच्या हव्यासामुळे आजवर अनेक स्त्रियांवर अत्याचार झाले आहेत. आज शहरी भागामध्ये प्रेमविवाह वगळले, तर रीतसर लग्न जमविण्यासाठी वधू-वर सूचक मंडळ किंवा नातेवाईक, मित्रमंडळींची मदत घेतली जाते. ग्रामीण भागामध्ये वधू-वर सूचक मंडळाचे जाळे इतके सध्या पसरलेले दिसत नाही. त्यामुळे तिथे काका, मामा, आत्याच्या ओळखीने लग्ने जमवली जातात. एकदा मुलामुलीच्या घरच्यांनी होकार कळविल्यानंतर लग्नाची बोलणी करण्यासाठी बैठक बोलावतात. मग यामध्ये एखादा मध्यस्थ किंवा नात्यातील माणूस हुंड्याची रक्कमनिश्र्चित करण्यासाठी मदत करतो. कायद्याने असे लोकसुद्धा गुन्हेगारच ठरतात. त्यांनाही हुंडा देणार्‍या आणि घेणार्‍याइतकीच किंवा दोन वर्षांपर्यंत कारावास आणि रु. दहा हजारपर्यंत दंड होऊ शकतो.
Attachments area

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोपर्डी बलात्कार: आरोपींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. नवी दिल्ली : राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. बचावपक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका तातडीने फेटाळल्याने, पुन्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी आजच सत्र न्यायालयात पुढील सुनावणी होत आहे. यापूर्वी आरोपीच्या वकिलांनी उज्ज्वल निकम, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साक्ष घेण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका केली होती. मात्र ही याचिका सत्र न्यायालयासह हायकोर्टानेही फेटाळली होती. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने इथेही त्यांची डाळ शिजू दिली नाही. या सर्वप्रकारावरुन आरोपीच्या वकिलांकडून वेळ काढूपणा स...
कोपर्डी प्रकरणातील अरोपीवर हल्ला केलेल्या संशयित आरोपींना समाजातील नेते न्याय देतील का - नागेश मिठे.   बीड ( प्रतिनिधी ) अठरा पगड जाती धर्माला सोबती घेऊन चालणाऱ्या नेत्यांना कोपर्डीतील आरोपीवर झालेल्या हल्लीतील संशयित आरोपी गणेश खुणे, अमोल खुणे, बाबु वाळेकर, राजु जराड हे आजही पुणे येथिल येरावडा जेल मध्ये आहेत. यांच्या कडे एकही मराठा समाजाचा नेता लाजिरवाने सुद्धा फिरकला नाही. याचा समाजाने असा अर्थ घ्यायचा कि हे प्रकरण नेत्यांना पेलवत नाही असा अर्थ हळु हळू मराठा समाजात निघत आहे.या सामान्य बांधवांची कुठलीही चुक नसतांनाही कट रचून त्यांच्यावर अठरा सिटे ॲक्ट सारखे गंभीर  स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडे जानिवपुर्वक समाज व समाजातिल ईतर कामात दंड थोपटवणारे नेते दुर्लक्ष करत आहेत. याच गोष्टींचा शासन फायदा ऊठवून शासन त्यांना जामिन सुद्धा देत नाही.न्याय व्यवस्थेची हिच तत्परता कोपर्डीतील अरोपीवर शासन का दाखवत नाही.फास्ट्रोक च्या नावाखाली शासन अरोपीला अभय देत आहे या पैक्षा दुदैव काय आसेल. दि.१एप्रील २०१७ रोजी अहमदनगर  जिल्ह्यातील कोपर्डी येथे चिमुकलीवर झालेला ब...
शेतकर्यांच्या विज प्रश्नांवर छावा क्रांतीवीर सेनेने घातला महावितरणला घेराव.नागेश मिठेपाटिल बीड प्रतिनिधी; आज शेतकरी बोंडआळीने अडचणीत आहे.आणि हे सरकार महावितरणाला शेतकर्याची विज तोडायला सांगत हे सरकार शेतकर्याच्या मुळावर आहे आसे शेतकरी बाधंवा वाटते कुठे या वर्षी पाऊस बरा झाल्यामुळे विहिर बोअरला थोडे पाणी आले आहे.  data-language="en"> मात्र महावितरणच्या आडमुठेपणामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. data-language="en"> पण याची जाण ना सरकारला आहे ना अधिकार्यांना यांना जाब विचारण्यासाठी आज दि. 04 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:00  ते 01:00 वाजेपर्यंत घेरावात घेऊन मा.कार्यकारी अभियंता त्र्यंबके साहेब यांना चर्चा केल्यानंतर छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकारी व शेतकरी बांधवांना सहानुभूतीपूर्वक निवेदन घेऊन कर्मचार्यांना विज जोडणीचे आदेश दिले. यानंतर छावा क्रांतीवीर सेनेने आभारही मानले यावेळी छावा क्रांतीवीर सेना मराठवाडा अध्यक्ष नागेशजी मीठे पाटील, छावा क्रांतीवीर सेना युवक जिल्हा अध्यक्ष अशोक काळकुटे पाटील, शे.का.प.चे नेते भाई दत्ता प्रभाळे, नवनिर्वाचित छा...
शिक्षिकेला भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर पेटवलं! केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. बंगळुरु : भर वर्गात शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोर पेटवल्याची धक्कादायक घटना बंगळुरुतील एका शाळेत घडली आहे. पीडित शिक्षिकेच्या बिझनेस पार्टनरने अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. केजी सुनंदा असं भाजलेल्या शिक्षिकेचं नाव आहे. या घटनेत ती 50 टक्के भाजली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिक्षिका गंभीर भाजली असून तिला देखरेखीखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शिक्षिकेला पेटवून दिल्यानंतर आरोपी रेणुकाराध्या पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. “दुपारी 2 च्या सुमारास एक व्यक्ती वर्गात शिरला आणि शिक्षिकेवर ओरडू लागला. त्यानंतर त्यांच्यात काही क्षण वाद झाला. शिक्षिकेने त्याला वर्गातून बाहेर जाण्यास सांगितलं. मात्र त्याचवेळी त्याने हातातील बाटलीचं झाकण उघडून शिक्षिकेच्य...
दृष्टिकोन : स्वतंत्र मराठवाडा राज्य खरंच शक्य आहे? संजीव उन्हाळे हे यासह सामायिक करा Facebook   हे यासह सामायिक करा Twitter   हे यासह सामायिक करा Messenger   data-language="en"> हे यासह सामायिक करा ईमेल   ख्यातनाम जलतज्ज्ञ आणि स्टॉकहोम पुरस्काराचे मानकरी डॉ. माधवराव चितळे यांनी विकासासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्य होणं आवश्यक आहे, अशी आग्रही मागणी केली. पण, ही मागणी किती व्यवहार्य आहे याचं ज्येष्ठ पत्रकार आणि मराठवाड्याचे अभ्यासक संजीव उन्हाळे यांनी केलेलं विश्लेषण. भाषेचं बंधन पाळून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. पण या एकमेव बंधनावर आधारित संकल्पना फार काळ रुजणार नाही, असं प्रतिपादन डॉ. माधवराव चितळे यांनी गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार घेताना व्यक्त केलं. स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे, ही मागणी या पूर्वीही अधूनमधून करण्यात येत होती. अर्थात, राज्य सरकार मराठवाड्याकडे सापत्नभावानं पाहतं, हे निदर्शनास आणून देण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात ही मागणी केली गेली.  तथापि, या मागणीला मराठवाड्यातून फारसा प्र...
मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?   निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आगोदर मराठा समाजातील शेतकरी आत्महत्या करायचे परंतू आता मात्र यांच मराठा समाजातील शेतकर्याची मुल आणि मुली ही घरच्या हलाखीच्या परिस्थितीला आणि शिक्षण करण्याची ईच्छा असतानाही शिक्षण पुर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागते या नैराशेतून मराठा समाजातील मुल-मुली आत्महत्ये सारखा मार्ग स्वकारत आहेत अशी एक घटना लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली ईथे घडली आहे दोन वर्षापासून  विवाह थाबल्याने आणि हुडां देण्यासाठी डिलांकडे पैैसे नसल्याने मराठा समाजातील शितल वायाळ यांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आहे त्यामुळे मराठा समाजात हुडां घेणे खरच योग्य आाहे का ? असा सवाल ही उपस्थित होत आहे त्यामुळे आज पासून हुंडा बंदीसाठी मराठा समाजातील बाधवांंनी जेवढे जमल तेवढे प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि लातूर येथीील शितल वायाळ ही मुलगी भिसे वाघोली  गावाची आहे आणि ततिने  हुंड्यासाठी आत्महत्या केल्याची दुरदैैवी घटना घडली...
लॉजवरील छाप्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; तिघांविरोधात गुन्हा निलेश चाळक बीड- अंबाजोगाई  शहरातील प्रशांतनगर भागातील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी   वेश्याव्यवसायाचा  पर्दाफाश केला. अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्ष व अंबाजोगाई शहर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही संयुक्त कारवाई केली. यावेळी दोन महिलांची सुटका करण्यात आली असून तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार,  प्रशांतनगर भागातील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्षाच्या प्रमुख व फौजदार दीपाली गीते यांना मिळाली होती.  त्यांनी पोलिस अधीक्षकांना ही माहिती दिली. जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार अप्पर  अधीक्षक वैभव कलुबर्मे, अंबाजोगाईचे   अधीक्षक अजित बोऱ्हाडे व सहायक   अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गीते, शहर ठाण्याचे फौजदार भारत माने, फौजदार देवकन्या मैंदाड, पो. कॉ. नीलावती खटाणे, सलीम पाशा, विकास नेवडे यांनी मंगळवारी दुपारी जनता लॉजवर छापा टाकला. ल...
अकलूजमध्ये 36 महिलांचा गर्भपात करणारं डॉक्टर दाम्पत्य अटकेत अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.   सोलापूर : अकलूज येथील डॉक्टर तेजस आणि प्रिया  गांधी दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर तेजसचे वडिल प्रदीप गांधी यांना काही महिन्यांपूर्वीच गर्भपात केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. वाई येथील एका सीआरपीएफ जवानांच्या पत्नीचे गर्भपात येथे झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या हॉस्पिटलवर छापा टाकला. तपासणी केली असता या दाम्पत्यानं आतापर्यंत 36 गर्भपात केल्याची माहिती उघड झाली. डॉक्टर तेजस गांधी यांचे वडील डॉक्टर प्रदीप गांधी यांनाही गर...
अमरावतीत विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकल्याची आरोपींची कबुली   अमरावती : अमरावतीमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड नाही तर उकळतं तेल फेकल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी सांगितंल आहे. काल (मंगळवार) संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान मालटेकडी भागात हा प्रकार घडला होता. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचही आरोपींनी मान्य केलं आहे.  याप्रकरणी ३ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास दोघांनी तिला गाठून तिच्यावर उकळतं तेलं फेकलं. या हल्ल्यात ती 12 टक्के भाजली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. data-language="en">
शेतकर्याच्या प्रश्नावर छावा क्रांतीवीर सेना उतरणार रस्त्यावर - नागेश मिठेपाटिल बीड (प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यामध्ये पाऊस कमि प्रमाणात होता त्यामुळे मुग. स्वायबिन.तिळ व आदी नगदि पिक वाया गेलेले आहेत त्यामुळे आज शेतकरी हावाल दिल झालेला आहे आणी सरकार कर्ज माफिच्या नाव खाली शेतकर्याला फसवत आहे  सरकारने आत्ता प्रयत्न एक हि योजना शेतकर्याला दिली नाही नुसत्या फसव्या घोषणा सरकार करत आहे लोकांना नगदी दहा हजार रूपये पेरणी साठी देऊ म्हणाले ते पन बॅकं वाल्यानी दिले नाही व वरून मुख्यशाखेला अहवाल पाटवला आमच्या कडे एकही शेतकरी दहा हजार रूपये मागणी करता आला नाही या अशा सरकारच्या व बॅकं आधिकार्याच्या दुटपी धोरणाला शेतकरी वैतागला आहे आज कुठतरी थोडा पाऊस पडला आहे त्यामुळे शेतकरी रब्बीची पेरणी करण्याची तयारी करतोय पन हि भरण घेण्यास पैसा नाही त्यामुळे ज्या शेतकर्याला आत्ता प्रयत्न पिक कर्ज मिळाले नाही आशा शेतकर्याना बॅकेंने तात्काळ पिक कर्ज द्यावे नसता छावा क्रांतीवीर सेना रस्त्यावर उतरेल असा ईशारा मराठवाडा आध्यक्ष नागेश मिठेपाटिल यांनी दिला या वेळी आशोक काळकुटे राहुल हाकाळे गणेश मावसकर  दिपक शिदे...