‘लग्नासाठी स्थळ शोधताना अपेक्षा मर्यादित ठेवा’जळगाव -
लग्नासाठी स्थळ शोधत असताना अपेक्षा मर्यादित ठेवा जेणेकरून चांगले सगेसोयरे मिळतील, असा सल्ला आमदार एकनाथ खडसे यांनी दिला. लेवा नवयुवक संघटनेतर्फे रविवारी (दि. २६) लेवा पाटीदार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा शिवतीर्थ मैदानावर आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत हाेते.
स्त्री-पुरुषांच्या जन्मदरातील तफावतीमुळे लग्नासाठी मुली मिळत नाही. यातच मुलींकडून नवरदेव शोधत असताना त्यांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे पाल्यांचे वय निघून गेल्यानंतर त्यांचे लग्न होत नाही, असेही खडसेंनी सांगितले. रविवारी (दि. २६) आयोजित करण्यात आलेल्या आमदार एकनाथ खडसे यांच्या हस्ते महामेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून महामेळाव्यास सुरुवात करण्यात आली.
यानंतर लेवा पाटीदार समाजातील शिक्षित, उच्चशिक्षित, शेतकरी, व्यावसायिक विवाहेच्छू युवक युवतींनी परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भोरगाव लेवापंचायतचे कुटुंब नायक रमेश पाटील, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार सुरेश भोळे, महापौर ललीत कोल्हे, जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके, डॉ. ए. जी. भंगाळे, पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, उद्योजक सुनील बढे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, सुहास वारके, असिस्टंट कमिशनर उन्मेष महाजन आदी उपस्थित होते.
शेतकरी कुटुंबाची जबाबदारी म्हणून शेती व्यवसाय करणार्या मुलाला जर उच्चशिक्षित मुलगी वधू म्हणून मिळाली. तर दोन्हीही मिळून कृषी क्षेत्रात मोठे कार्य करून कायापालट करू शकतील, असा विश्वास आमदार खडसेंनी व्यक्त केला. मुलीच्या लग्नासाठी स्थळ शोधताना पहिल्यांदा मुलगा शासकीय नोकरदार पाहिजे अशी अट असते. तसेच प्रत्येकाची मानसिकता ही मुलगा हा एकटा असावा, मोठा पगारदार असावा अशी तयार झाली आहे, असेही आमदार खडसे यांनी सांगितले.
लग्नासाठी स्थळ शोधत असताना अपेक्षा मर्यादित ठेवा जेणेकरून चांगले सगेसोयरे मिळतील, असा सल्ला आमदार एकनाथ खडसे यांनी दिला. लेवा नवयुवक संघटनेतर्फे रविवारी (दि. २६) लेवा पाटीदार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा शिवतीर्थ मैदानावर आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत हाेते.
स्त्री-पुरुषांच्या जन्मदरातील तफावतीमुळे लग्नासाठी मुली मिळत नाही. यातच मुलींकडून नवरदेव शोधत असताना त्यांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे पाल्यांचे वय निघून गेल्यानंतर त्यांचे लग्न होत नाही, असेही खडसेंनी सांगितले. रविवारी (दि. २६) आयोजित करण्यात आलेल्या आमदार एकनाथ खडसे यांच्या हस्ते महामेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून महामेळाव्यास सुरुवात करण्यात आली.
यानंतर लेवा पाटीदार समाजातील शिक्षित, उच्चशिक्षित, शेतकरी, व्यावसायिक विवाहेच्छू युवक युवतींनी परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भोरगाव लेवापंचायतचे कुटुंब नायक रमेश पाटील, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार सुरेश भोळे, महापौर ललीत कोल्हे, जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके, डॉ. ए. जी. भंगाळे, पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, उद्योजक सुनील बढे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, सुहास वारके, असिस्टंट कमिशनर उन्मेष महाजन आदी उपस्थित होते.
शेतकरी कुटुंबाची जबाबदारी म्हणून शेती व्यवसाय करणार्या मुलाला जर उच्चशिक्षित मुलगी वधू म्हणून मिळाली. तर दोन्हीही मिळून कृषी क्षेत्रात मोठे कार्य करून कायापालट करू शकतील, असा विश्वास आमदार खडसेंनी व्यक्त केला. मुलीच्या लग्नासाठी स्थळ शोधताना पहिल्यांदा मुलगा शासकीय नोकरदार पाहिजे अशी अट असते. तसेच प्रत्येकाची मानसिकता ही मुलगा हा एकटा असावा, मोठा पगारदार असावा अशी तयार झाली आहे, असेही आमदार खडसे यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा