मुख्य सामग्रीवर वगळा

मूक मोर्चा काढतोय काढू द्या, त्याचं गाऱ्हाणं मांडतोय मांडू द्या. आमच्या शांततेची योग्य दखल घ्या

मूक मोर्चा काढतोय काढू द्या, त्याचं गाऱ्हाणं मांडतोय मांडू द्या. आमच्या शांततेची योग्य दखल घ्या निलेश चाळक -बीड मो,9767894619 कोपर्डीच्या घटनेनतंर राज्यभरात एकापाठोपाठ एक असे मराठा क्रांती मुक मोर्चे निघत आहे व मराठवाड्यात आठ ही जिल्ह्यात हे मुक मोर्चे काढण्यात आले आहेत आत्ता हा मराठा क्रांती मुक मोर्चा दिवाळी आगोदर मुबईत जाऊन धडकणार आहे आणि या मोर्चा एक कोटी च्या वर मराठा बाधव सहभागी होत त्यामुळे या मराठा क्रांती मोर्चाची सर्वाना उत्सुकता लागली आहे या मराठा क्रांती मुक मोर्चातून कोपर्डी प्रकरणातील आरोपीना फाशी शिक्षा द्या मराठा समाजाला आरक्षण द्या ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा या प्रमुख तीन मागण्या करण्यात येत आहेत त्यामुळे या मागण्या सरकारने मान्य करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे व मुख्यंमत्र्यानी कोणत्याही मराठा नेत्यासोबत चर्चा न करता मुबंईतील मोर्चाला समोर येऊन चर्चा करावी आणि आज मराठा जातीवर उतरतोय त्याला उतरू द्या , मूक मोर्चा काढतोय काढू द्या, त्याचं गाऱ्हाणं मांडतोय मांडू द्या. आमच्या शांततेची योग्य दखल घ्या १७ व्या शतकात स्वराज्य उभारणीला काही हजार मावळ्यानिशी सुरुवात झाली होती त्याचे १८ व्या शतकात लाखोंच्या सेनासागरात रुपांतर झालं.इतका सशस्त्र सेनासागर कि आश्चर्याने आणि भीतीने नजरबंदी व्हावी. असाच नजरबंदी करणारा निशस्त्र मराठ्यांचा जनसागर त्याच लष्करी शिस्तीत संपूर्ण महाराष्ट्रातून वाहू लागला आहे.त्यामुळे आज मराठा जातीवर उतरतोय त्याला उतरू द्या , मूक मोर्चा काढतोय काढू द्या, त्याचं गाऱ्हाणं मांडतोय मांडू द्या. आमच्या शांततेची योग्य दखल घ्या नाहीतर ज्यांच्याकडे हिसकावून घेण्याची ताकद असते ते शांतताप्रिय पद्धतीने सहसा कधीच मागणी करत नाहीत. याच तत्वाने जाट,पाटीदार या क्षत्रिय बांधवांनी हिंसक पद्धतीने आंदोलने केली ज्यात अनेक जीव गेले, मालमत्तेचे नुकसान झाले, जनजीवन ठप्प झाले. मराठ्यांनी या उलट हिंसा,घोषणाबाजी,आंदोलन ना करता मूक मोर्चे काढून दाखवून दिलं कि संयम आणि सत्वशीलता हि शिवछत्रपतींनी शिकवलेली मूल्ये आमच्यात किती खोलवर रुजली आहेत. महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीनंतर इतक्या मोठ्या संख्येने शांततापूर्ण मार्गाने मोर्चे निघण्याची हि बहुदा पहिलीच वेळ आहे. किंबहुना भारतात झालेल्या कोणत्याही आंदोलनाचे ,मोर्च्याचे गर्दीचे रेकॉर्ड्स या मोर्चाने मोडीत काढले आहेत.तरीही काही उपद्रवी मूल्ये मराठ्यांना उकसवण्याचा प्रयत्न करत आहेत, काही मीडियावाले याला मराठ्यांची दादागिरी म्हणत आहेत तर काही जण राजकीय रंग भरत आहेत.मराठ्यांना दादागिरी करायची असती, जोर लावायचा असता,जहालपणा दाखवायचा असता तर महाराष्ट्र पेटवून मराठे कधीच मोकळे झाले असते . पण परकीयांच्या आक्रमणाने विखुरलेल्या या देशाला,महाराष्ट्राला एकसंध करण्याचं, पुनरुभारणी करण्याचं काम मराठ्यांनी केलं, ते या देशातल्या कागदाच्या तुकड्याचेही नुकसान करणार नाहीत. कारण आमच्या जातीचा इतिहास हा देशाच्या मातीशी जोडला गेलाय ते हि रक्ताने. आमचे मोर्चे हे स्वयंस्फूर्तीने उभे राहिले आहेत कोणी दादा,मामा,अण्णा,बुवा,साहेब,शिक्षणसम्राट,साखरसम्राट आमचे नेते नाहीत.होय आमच्यातले काही हिंदुत्ववादी आहेत,काही समाजवादी आहेत काही पुरोगामी आहेत,नास्तिक,आस्तिक आहेत पण मोर्चात आम्ही आमचे हे मुखवटे काढून फक्त आणि फक्त मराठा या आमच्या अस्सल चेहऱ्याने सामील होत आहेत या मोर्चाचा नेता आणि स्फुर्तीदाता जर कोणी असेल तर ते आमचे छत्रपती शिवराय आहेत. जे आम्हाला या मोर्च्यादरम्यान शिस्त ,स्वच्छता,संयम आणि संघटन करण्यास मार्गदर्शन करत आहेत. जेव्हा कोपर्डीची घटनेमध्ये एवढ्या क्रूर पद्धतीने एका निरपराध मुलीची हत्या होते, आपण काहीच करू शकत नाही अशी भावाना समाजामध्ये रूजायला लागली. महिलेवर अत्याचार केला म्हणून आपल्याच समाजाच्या रांझ्याच्या पाटलाचाही चौरंग मराठ्यांनी केला ,नोकरी,शिक्षण,राजकारण यामधील आरक्षणातून, कायद्याने दिलेल्या संरक्षणाच्या माध्यमातून इतरांना कायम 'जातीवर' उतरण्याची संधी मिळत गेली. मराठ्यांनी याबाबत तक्रार कधीच नाही केली याउलट राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकाराने आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मराठ्यांनी आवाज काढला तर दिल्लीत बसलेल्यांनाही कानठळ्या बसतील यात शंका नाही. आज मराठा जातीवर उतरतोय त्याला उतरू द्या , मूक मोर्चा काढतोय काढू द्या, त्याचं गाऱ्हाणं मांडतोय मांडू द्या. आमच्या शांततेची योग्य दखल घ्या आणि त्याचे निर्णयात रूपांतर करा. १७ व्या , १८व्या शतकात मराठ्यांच्या लाखोंच्या सशस्त्र फौजांपुढे सर्व उपद्रवी शक्तींनी हात टेकले ,भारतीय उपखंडात जिथे जिथे म्हणून मराठे शिरले तिथे विजयाचा गुलाल उधळला . आज त्याची जागा "शिस्त ,स्वच्छता आणि संयम " राखून लाखोंच्या मूक आणि निशस्त्र मोर्चाने घेतली असली तरी निकाल तोच लागेल जो पूर्वी लागला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोपर्डी बलात्कार: आरोपींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. नवी दिल्ली : राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. बचावपक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका तातडीने फेटाळल्याने, पुन्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी आजच सत्र न्यायालयात पुढील सुनावणी होत आहे. यापूर्वी आरोपीच्या वकिलांनी उज्ज्वल निकम, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साक्ष घेण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका केली होती. मात्र ही याचिका सत्र न्यायालयासह हायकोर्टानेही फेटाळली होती. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने इथेही त्यांची डाळ शिजू दिली नाही. या सर्वप्रकारावरुन आरोपीच्या वकिलांकडून वेळ काढूपणा स...
कोपर्डी प्रकरणातील अरोपीवर हल्ला केलेल्या संशयित आरोपींना समाजातील नेते न्याय देतील का - नागेश मिठे.   बीड ( प्रतिनिधी ) अठरा पगड जाती धर्माला सोबती घेऊन चालणाऱ्या नेत्यांना कोपर्डीतील आरोपीवर झालेल्या हल्लीतील संशयित आरोपी गणेश खुणे, अमोल खुणे, बाबु वाळेकर, राजु जराड हे आजही पुणे येथिल येरावडा जेल मध्ये आहेत. यांच्या कडे एकही मराठा समाजाचा नेता लाजिरवाने सुद्धा फिरकला नाही. याचा समाजाने असा अर्थ घ्यायचा कि हे प्रकरण नेत्यांना पेलवत नाही असा अर्थ हळु हळू मराठा समाजात निघत आहे.या सामान्य बांधवांची कुठलीही चुक नसतांनाही कट रचून त्यांच्यावर अठरा सिटे ॲक्ट सारखे गंभीर  स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडे जानिवपुर्वक समाज व समाजातिल ईतर कामात दंड थोपटवणारे नेते दुर्लक्ष करत आहेत. याच गोष्टींचा शासन फायदा ऊठवून शासन त्यांना जामिन सुद्धा देत नाही.न्याय व्यवस्थेची हिच तत्परता कोपर्डीतील अरोपीवर शासन का दाखवत नाही.फास्ट्रोक च्या नावाखाली शासन अरोपीला अभय देत आहे या पैक्षा दुदैव काय आसेल. दि.१एप्रील २०१७ रोजी अहमदनगर  जिल्ह्यातील कोपर्डी येथे चिमुकलीवर झालेला ब...
शेतकर्यांच्या विज प्रश्नांवर छावा क्रांतीवीर सेनेने घातला महावितरणला घेराव.नागेश मिठेपाटिल बीड प्रतिनिधी; आज शेतकरी बोंडआळीने अडचणीत आहे.आणि हे सरकार महावितरणाला शेतकर्याची विज तोडायला सांगत हे सरकार शेतकर्याच्या मुळावर आहे आसे शेतकरी बाधंवा वाटते कुठे या वर्षी पाऊस बरा झाल्यामुळे विहिर बोअरला थोडे पाणी आले आहे.  data-language="en"> मात्र महावितरणच्या आडमुठेपणामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. data-language="en"> पण याची जाण ना सरकारला आहे ना अधिकार्यांना यांना जाब विचारण्यासाठी आज दि. 04 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:00  ते 01:00 वाजेपर्यंत घेरावात घेऊन मा.कार्यकारी अभियंता त्र्यंबके साहेब यांना चर्चा केल्यानंतर छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकारी व शेतकरी बांधवांना सहानुभूतीपूर्वक निवेदन घेऊन कर्मचार्यांना विज जोडणीचे आदेश दिले. यानंतर छावा क्रांतीवीर सेनेने आभारही मानले यावेळी छावा क्रांतीवीर सेना मराठवाडा अध्यक्ष नागेशजी मीठे पाटील, छावा क्रांतीवीर सेना युवक जिल्हा अध्यक्ष अशोक काळकुटे पाटील, शे.का.प.चे नेते भाई दत्ता प्रभाळे, नवनिर्वाचित छा...
शिक्षिकेला भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर पेटवलं! केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. बंगळुरु : भर वर्गात शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोर पेटवल्याची धक्कादायक घटना बंगळुरुतील एका शाळेत घडली आहे. पीडित शिक्षिकेच्या बिझनेस पार्टनरने अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. केजी सुनंदा असं भाजलेल्या शिक्षिकेचं नाव आहे. या घटनेत ती 50 टक्के भाजली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिक्षिका गंभीर भाजली असून तिला देखरेखीखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शिक्षिकेला पेटवून दिल्यानंतर आरोपी रेणुकाराध्या पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. “दुपारी 2 च्या सुमारास एक व्यक्ती वर्गात शिरला आणि शिक्षिकेवर ओरडू लागला. त्यानंतर त्यांच्यात काही क्षण वाद झाला. शिक्षिकेने त्याला वर्गातून बाहेर जाण्यास सांगितलं. मात्र त्याचवेळी त्याने हातातील बाटलीचं झाकण उघडून शिक्षिकेच्य...
दृष्टिकोन : स्वतंत्र मराठवाडा राज्य खरंच शक्य आहे? संजीव उन्हाळे हे यासह सामायिक करा Facebook   हे यासह सामायिक करा Twitter   हे यासह सामायिक करा Messenger   data-language="en"> हे यासह सामायिक करा ईमेल   ख्यातनाम जलतज्ज्ञ आणि स्टॉकहोम पुरस्काराचे मानकरी डॉ. माधवराव चितळे यांनी विकासासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्य होणं आवश्यक आहे, अशी आग्रही मागणी केली. पण, ही मागणी किती व्यवहार्य आहे याचं ज्येष्ठ पत्रकार आणि मराठवाड्याचे अभ्यासक संजीव उन्हाळे यांनी केलेलं विश्लेषण. भाषेचं बंधन पाळून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. पण या एकमेव बंधनावर आधारित संकल्पना फार काळ रुजणार नाही, असं प्रतिपादन डॉ. माधवराव चितळे यांनी गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार घेताना व्यक्त केलं. स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे, ही मागणी या पूर्वीही अधूनमधून करण्यात येत होती. अर्थात, राज्य सरकार मराठवाड्याकडे सापत्नभावानं पाहतं, हे निदर्शनास आणून देण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात ही मागणी केली गेली.  तथापि, या मागणीला मराठवाड्यातून फारसा प्र...
मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?   निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आगोदर मराठा समाजातील शेतकरी आत्महत्या करायचे परंतू आता मात्र यांच मराठा समाजातील शेतकर्याची मुल आणि मुली ही घरच्या हलाखीच्या परिस्थितीला आणि शिक्षण करण्याची ईच्छा असतानाही शिक्षण पुर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागते या नैराशेतून मराठा समाजातील मुल-मुली आत्महत्ये सारखा मार्ग स्वकारत आहेत अशी एक घटना लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली ईथे घडली आहे दोन वर्षापासून  विवाह थाबल्याने आणि हुडां देण्यासाठी डिलांकडे पैैसे नसल्याने मराठा समाजातील शितल वायाळ यांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आहे त्यामुळे मराठा समाजात हुडां घेणे खरच योग्य आाहे का ? असा सवाल ही उपस्थित होत आहे त्यामुळे आज पासून हुंडा बंदीसाठी मराठा समाजातील बाधवांंनी जेवढे जमल तेवढे प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि लातूर येथीील शितल वायाळ ही मुलगी भिसे वाघोली  गावाची आहे आणि ततिने  हुंड्यासाठी आत्महत्या केल्याची दुरदैैवी घटना घडली...
लॉजवरील छाप्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; तिघांविरोधात गुन्हा निलेश चाळक बीड- अंबाजोगाई  शहरातील प्रशांतनगर भागातील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी   वेश्याव्यवसायाचा  पर्दाफाश केला. अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्ष व अंबाजोगाई शहर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही संयुक्त कारवाई केली. यावेळी दोन महिलांची सुटका करण्यात आली असून तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार,  प्रशांतनगर भागातील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्षाच्या प्रमुख व फौजदार दीपाली गीते यांना मिळाली होती.  त्यांनी पोलिस अधीक्षकांना ही माहिती दिली. जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार अप्पर  अधीक्षक वैभव कलुबर्मे, अंबाजोगाईचे   अधीक्षक अजित बोऱ्हाडे व सहायक   अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गीते, शहर ठाण्याचे फौजदार भारत माने, फौजदार देवकन्या मैंदाड, पो. कॉ. नीलावती खटाणे, सलीम पाशा, विकास नेवडे यांनी मंगळवारी दुपारी जनता लॉजवर छापा टाकला. ल...
अकलूजमध्ये 36 महिलांचा गर्भपात करणारं डॉक्टर दाम्पत्य अटकेत अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.   सोलापूर : अकलूज येथील डॉक्टर तेजस आणि प्रिया  गांधी दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर तेजसचे वडिल प्रदीप गांधी यांना काही महिन्यांपूर्वीच गर्भपात केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. वाई येथील एका सीआरपीएफ जवानांच्या पत्नीचे गर्भपात येथे झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या हॉस्पिटलवर छापा टाकला. तपासणी केली असता या दाम्पत्यानं आतापर्यंत 36 गर्भपात केल्याची माहिती उघड झाली. डॉक्टर तेजस गांधी यांचे वडील डॉक्टर प्रदीप गांधी यांनाही गर...
अमरावतीत विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकल्याची आरोपींची कबुली   अमरावती : अमरावतीमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड नाही तर उकळतं तेल फेकल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी सांगितंल आहे. काल (मंगळवार) संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान मालटेकडी भागात हा प्रकार घडला होता. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचही आरोपींनी मान्य केलं आहे.  याप्रकरणी ३ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास दोघांनी तिला गाठून तिच्यावर उकळतं तेलं फेकलं. या हल्ल्यात ती 12 टक्के भाजली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. data-language="en">
शेतकर्याच्या प्रश्नावर छावा क्रांतीवीर सेना उतरणार रस्त्यावर - नागेश मिठेपाटिल बीड (प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यामध्ये पाऊस कमि प्रमाणात होता त्यामुळे मुग. स्वायबिन.तिळ व आदी नगदि पिक वाया गेलेले आहेत त्यामुळे आज शेतकरी हावाल दिल झालेला आहे आणी सरकार कर्ज माफिच्या नाव खाली शेतकर्याला फसवत आहे  सरकारने आत्ता प्रयत्न एक हि योजना शेतकर्याला दिली नाही नुसत्या फसव्या घोषणा सरकार करत आहे लोकांना नगदी दहा हजार रूपये पेरणी साठी देऊ म्हणाले ते पन बॅकं वाल्यानी दिले नाही व वरून मुख्यशाखेला अहवाल पाटवला आमच्या कडे एकही शेतकरी दहा हजार रूपये मागणी करता आला नाही या अशा सरकारच्या व बॅकं आधिकार्याच्या दुटपी धोरणाला शेतकरी वैतागला आहे आज कुठतरी थोडा पाऊस पडला आहे त्यामुळे शेतकरी रब्बीची पेरणी करण्याची तयारी करतोय पन हि भरण घेण्यास पैसा नाही त्यामुळे ज्या शेतकर्याला आत्ता प्रयत्न पिक कर्ज मिळाले नाही आशा शेतकर्याना बॅकेंने तात्काळ पिक कर्ज द्यावे नसता छावा क्रांतीवीर सेना रस्त्यावर उतरेल असा ईशारा मराठवाडा आध्यक्ष नागेश मिठेपाटिल यांनी दिला या वेळी आशोक काळकुटे राहुल हाकाळे गणेश मावसकर  दिपक शिदे...